शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्ता बांधला पण नदीवर पूल बांधायलाच विसरले; 15 वर्षांपासून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 12:33 IST

Forgot Built Bridge On River : गेल्या 15 वर्षांपासून गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यामधील एका गावातील लोकांना सरकारी कामातील गोंधळाचा फटका बसला आहे. गेल्या 15 वर्षांपासून गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची माहिती आता समोर आली आहे. सोमेश्वर विधानसभा क्षेत्रामधील लोकांना सरकारी कामातील बेजबाबदारपणाचा फटका बसला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने ताकुला ते सोमेश्वर असा रस्ता तर तयार केला आहे. पण रस्ता तयार करताना नदीवर पूल बांधायलाच विसरले. 

नदीवर पूल नसल्याने स्थानिकांना रोज जीव मुठीत घालून नदी पार करावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश्वर विधानसभा मतदारसंघामधील बसौली-सोमेश्वर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आला आहे. मात्र त्यावेळी या मार्गात लागणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. ते काम अद्यापही अपूर्णच आहे. येथील विधानसभा मतदारसंघामधून 2007 साली निवडून आलेले अजम टम्टा हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. 

सरकारी कामातील गोंधळाचा फटका, स्थानिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

आमदार रेखा आर्या सध्या राज्यमंत्री आहेत. मात्र असं असतानाही या नदीवरील पूल बांधण्याची योजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा पंचायतीचे सदस्य असणाऱ्या योगेश बाराकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालत जाणारे लोक असो किंवा बाईक अथवा चारचाकी गाडीने जाणारी मंडळी असो सर्वांना नदीच्या पाण्यामधूनच प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. अनेकदा गाड्या पण्याच्या प्रवाहामध्ये अडकतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. योगेश यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे.

पावसाळ्यामध्ये मुलांना शाळेत पाठवताना अधिक धोका

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा नदी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याच ताकुलवरुन सोमेश्वरला जाता येत नाही. महिला आणि मुलांना नदी ओलांडणे खूपच कठीण जातं. पावसाळ्यामध्ये मुलांना शाळेत पाठवताना अधिक धोका असल्याचं देखील स्थानिकांनी म्हटलं आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अल्मोडामधील अभियंते असणाऱ्या किशन आर्या यांनी या ठिकाणी पूल बांधण्याची योजना अनेकदा तयार करण्यात आली मात्र त्यासाठी ठेकेदार मिळाला नाही अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :riverनदीroad transportरस्ते वाहतूक