शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 20:48 IST

शिवसेना-भाजपाने अखेर आज युतीची घोषणा केली

मुंबई: शिवसेना-भाजपामधील युतीचं घोडं अखेर आज गंगेत न्हालं. भाजपा अध्यक्ष अमित शहा युतीच्या अंतिम चर्चेसाठी आज मुंबईत आले होते. यानंतर दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली. काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?, असा सवाल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मध्यंतरी दोन्ही पक्षांमध्ये काही गैरसमज झाले. मात्र आता आम्ही नव्यानं सुरुवात करत आहोत, असंदेखील ते म्हणाले. शिवसेना-भाजपा युती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. दोन्ही पक्षांचं धोरण एक आहे. त्यामुळे आता मतभेद नको. अन्यथा इतरांचं फावेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढल्यास त्याचा लाभ इतर पक्षांना होईल आणि देशाला, राज्याला पुन्हा भोगावं लागेल. काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी एकत्र यायला काय हरकत काय,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तमाम हिंदू याच क्षणाची वाट पाहत होता, असा दावादेखील उद्धव यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद घेतला. 'निवडणुका येत जात असतात. मात्र युतीचं नातं 30 वर्षे जुनं आहे,' असं ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरदेखील भाष्य केलं. 'अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला होता. त्यांनी कर्जमाफी दिली. मात्र यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. प्रधानमंत्री फसल बिमा योजना चांगली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडून हफ्ता घेण्यात आला. मात्र त्यांना नुकसान भरपाईच मिळाली नाही,' असं उद्धव म्हणाले. राम मंदिर ही देशाची ओळख असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. 'राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण तो हिंदुत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या ठिकाणचा कारभार चांगला असेल, तर तिथे रामराज्य आहे, असं आपण म्हणतो. त्यामुळे राम मंदिराची उभारणी होणं गरजेचं आहे,' असंदेखील ते म्हणाले. यावेळी उद्धव यांनी नाणार प्रकल्पाला दिलेल्या स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. नाणार प्रकल्पाची जागा बदलली जाईल. हा प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल. ज्या भागातील जनता या प्रकल्पासाठी जमिनी द्यायला तयार होईल, त्याच भागात हा प्रकल्प होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं उद्धव यांनी सांगितलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९