शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 20:48 IST

शिवसेना-भाजपाने अखेर आज युतीची घोषणा केली

मुंबई: शिवसेना-भाजपामधील युतीचं घोडं अखेर आज गंगेत न्हालं. भाजपा अध्यक्ष अमित शहा युतीच्या अंतिम चर्चेसाठी आज मुंबईत आले होते. यानंतर दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली. काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये?, असा सवाल यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. मध्यंतरी दोन्ही पक्षांमध्ये काही गैरसमज झाले. मात्र आता आम्ही नव्यानं सुरुवात करत आहोत, असंदेखील ते म्हणाले. शिवसेना-भाजपा युती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. दोन्ही पक्षांचं धोरण एक आहे. त्यामुळे आता मतभेद नको. अन्यथा इतरांचं फावेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढल्यास त्याचा लाभ इतर पक्षांना होईल आणि देशाला, राज्याला पुन्हा भोगावं लागेल. काही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी एकत्र यायला काय हरकत काय,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तमाम हिंदू याच क्षणाची वाट पाहत होता, असा दावादेखील उद्धव यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद घेतला. 'निवडणुका येत जात असतात. मात्र युतीचं नातं 30 वर्षे जुनं आहे,' असं ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरदेखील भाष्य केलं. 'अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला होता. त्यांनी कर्जमाफी दिली. मात्र यंत्रणेतील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. प्रधानमंत्री फसल बिमा योजना चांगली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडून हफ्ता घेण्यात आला. मात्र त्यांना नुकसान भरपाईच मिळाली नाही,' असं उद्धव म्हणाले. राम मंदिर ही देशाची ओळख असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. 'राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण तो हिंदुत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या ठिकाणचा कारभार चांगला असेल, तर तिथे रामराज्य आहे, असं आपण म्हणतो. त्यामुळे राम मंदिराची उभारणी होणं गरजेचं आहे,' असंदेखील ते म्हणाले. यावेळी उद्धव यांनी नाणार प्रकल्पाला दिलेल्या स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. नाणार प्रकल्पाची जागा बदलली जाईल. हा प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊन केला जाईल. ज्या भागातील जनता या प्रकल्पासाठी जमिनी द्यायला तयार होईल, त्याच भागात हा प्रकल्प होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं उद्धव यांनी सांगितलं. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९