शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

भागीदार असल्याचा आरोप म्हणजे माझ्यासाठी बक्षीसच, मोदींचा राहुल यांना नाव न घेता टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 8:46 PM

पंतप्रधानांनी नाव न घेता राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.

लखनऊ- पंतप्रधान आवास योजनेला आज तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं लखनऊमध्ये एका आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेतला होता. यावेळी मोदींनी विकासाच्या योजना जनतेला सांगतानाच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे.मी चौकीदार नसून भागीदार असल्याचा माझ्यावर काही जणांनी आरोप केला आहे. हा आरोप म्हणजे माझ्यासाठी बक्षीसच आहे. कारण देशाच्या विकासात मी भागीदार आहे. मला गर्व आहे की, घाम गाळणारे मजूर, दुःखी मातेचा मी भागीदार आहे.मी सियाचीनच्या जवानांचा आणि देशातील शेतक-यांचा भागीदार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राफेल घोटाळ्यावरून राहुल गांधींनी मोदी चौकीदार नव्हे, तर भागीदार असल्याचा आरोप केला होता. त्याला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींनाही उजाळा दिला.विविध योजनांच्या माध्यमांतून तीन वर्षांत झालेला शहरी विकासाचीही मोदींनी जनतेला माहिती दिली. ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी मी योगी सरकारचा आभारी आहे. यापूर्वीच्या सरकारला प्रत्येक वेळी पत्र लिहावं लागत होतं. परंतु काही लोक कामच करू इच्छित नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या बंगल्याची सजावट करायची होती. त्यातून त्यांना वेळच मिळत नव्हता, असं म्हणत मोदींनी यापूर्वीच्या अखिलेश सरकारवरही हल्लाबोल केला.2022पूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे घर असावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने शहरांमध्ये आतापर्यंत 54 लाख घरं, तर ग्रामीण भागातील जनतेच्या 1 कोटींपेक्षा अधिक घरांना मंजुरी दिली आहे. कोट्यवधी जनतेचे भवितव्य सुरक्षित बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो तीन वर्षांनंतर बळकट झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत माता-भगिनींच्या नावावर घरे दिली जात आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास 87 लाख घरांची नोंदणी महिलांच्या नावावर करण्यात आली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी