शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus: १३५ शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 16:43 IST

CoronaVirus: मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फैलावर घेतल्यानंतर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले.

ठळक मुद्देअलाहाबाद हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरेउच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारलेविविध भागांतील शिक्षकांचा अचानक मृत्यू

लखनऊ: देशभरातील विविध उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये कोरोनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोना उद्रेकाला काही प्रमाणात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकाही कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयानेनिवडणूक आयोगाला फैलावर घेतल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले असून, आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करत नोटीस बजावली आहे. (allahabad high court slams election commission over up panchayat elections death) 

कोरोनाच्या बिकट परिस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये ड्युटीवर असणाऱ्या १३५ शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरून उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारत, या शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? निवडणूक घेताना कोरोना नियमांचे का पालन केले नाही? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर का कारवाई केली जाऊ नये? अशा प्रश्नांची तोफ डागली आहे. या निवडणुकीत हजारो शिक्षक, शिक्षक मित्र आणि अनुदेशकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का; दिल्ली हायकोर्टाचा सवाल

उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले

जनतेच्या आरोग्याच्या अडचणी सोडवणे सरकारचे काम आहे. ते केले नाही, तर पुढील पिढी माफ करणार नाही. कोरोना संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यावर सरकार निवडणूक कामांमध्ये व्यस्त झाले. तेव्हाच उपाययोजना वाढवणे गरजेचे होते, या शब्दांत उच्च न्यायालयाने योगी सरकारची कानउघडणी केली आहे.

दिल्लीत केंद्राचा नवा कायदा लागू; आता नायब राज्यपाल हेच ‘सरकार’

विविध भागांतील शिक्षकांचा अचानक मृत्यू

शिक्षक महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रशिक्षण आणि कामानंतर हरदोई-लखीमपूर, बुलंदशहर, हाथरस, सीतापूर, शाहजहांपूर, लखनऊ, प्रतापगड, सोनभद्र, गाझियाबाद, गोंडा, कुशीनगर, जौनपूर, देवरिया, महाराजगंज, मथुरा, गोरखपूर, बहराइच, उन्नाव, बलरामपूर, श्रावस्ती येथील शिक्षक आणि शिक्षक मित्रांचा अचानक मृत्यू झाल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे. 

“चव्हाणसाहेब, आपण महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय नेतृत्वाची किंमत मोजत आहोत”

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला हवेत, असे खडे बोल मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले. मतमोजणीसाठी कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणी केलेल्या उपाययोजनांची ३० एप्रिलपर्यंत ब्ल्यू प्रिंट सादर न केल्यास २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखण्याचा कठोर इशाराही न्यायालयाने दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUttar Pradeshउत्तर प्रदेशHigh Courtउच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग