शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

"अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 05:49 IST

बंद दरवाजाआडची शिवीगाळ व अपमानाबद्दल या कायद्याची कलमे लावता येणार नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ किंवा अपमान हा सार्वजनिक दृष्टिपथात झाला असेल, तरच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा होऊ शकतो. बंद दरवाजाआडची शिवीगाळ व अपमानाबद्दल या कायद्याची कलमे लावता येणार नाहीत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. विनोद कुमार तनय यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू होती. के.पी. ठाकूर हे चौकशी अधिकारी व विनोद कुमार हे चौकशीत सादरकर्ता अधिकारी होते.चौकशीसाठी येताना विनोदकुमार तनय हे एम.पी. तिवारी या सहकारी व सामाजिक कार्यकर्त्यासोबत हजर राहिले. के.पी. ठाकूर यांनी तिवारी यांना बाहेर थांबण्यास सांगितले. यानंतर विनोदकुमार तनय यांनी त्यांना के.पी. ठाकूर यांनी आपल्या कार्यालयीन चेंबरचा दरवाजा बंद करून मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केल्याची आणि गंभीर परिणामाची धमकी दिल्याची तक्रार वरिष्ठांना व पोलिसांकडे केली. त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही, म्हणून त्यांनी न्यायालयात कलम ३२३ (मारहाण), ५०४ (शिवीगाळ), ५०६ (धमकी) आय.पी.सी. आणि ३ (१) (१०) अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे तक्रार दाखलकेली.न्यायालयाने २०२ सीआरपीसीप्रमाणे चौकशी करून प्रथमदर्शनी गुन्हा दिसत असल्याचे निष्कर्ष काढून के.पी. ठाकूर यांना समन्स बजावले. यास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.अलहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. रामकृष्ण गौतम यांनी चौकशी अधिकाऱ्याचा कक्ष हा सार्वजनिक दृष्टिपथातील (पब्लिक व्ह्यू) ठिकाण नाही.याठिकाणी जरी घटना घडली असेल तरी तो अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा होत नाही, असे म्हणत अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कलमे रद्द केली. चौकशी अधिकाºयाचे कार्यालय हे सार्वजनिक ठिकाण आहे. असा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र, ते सार्वजनिक ठिकाण असले तरी सार्वजनिक दृष्टिपथातील ठिकाण नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा होण्यासाठी ठिकाण सार्वजनिक दृष्टिपथातील असणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने स्पष्टकेले.या निकालात उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या वैजिनाथ कोंडिबा खांडके वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणातील निकालाचाही संदर्भ घेतला आहे.>जेव्हा एखाद्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाºयाविरुद्ध कनिष्ठ अधिकारी पिळवणूक व त्रासाची तक्रार देतो तेव्हा न्यायालयाने ती अतिशय काळजीपूर्वक तपासली पाहिजे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवलेच पाहिजेत; तरच ते आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम करून घेऊ शकतील.(वैजिनाथ कोंडिबा खांडके वि. महाराष्ट्र सरकारप्रकरणात सर्वोच्च न्यायालय)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय