शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेत घराणेशाही आणि जातीवाद; इलाहबादच्या न्यायाधीशांनी पंतप्रधानांना लिहिलं पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:08 IST

लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायव्यवस्था महत्वपूर्ण स्तंभ आहे. मात्र दुर्दैवाने सध्या न्याय व्यवस्थेत जातीवाद आणि घराणेशाही मोठ्या प्रमाणात फोफावली आहे.

नवी दिल्ली - न्यायालयात चालणारी घराणेशाही आणि जातीवादाविरोधात न्यायाधीश समोर येऊन आवाज उठवू लागले आहेत. इलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्याय व्यवस्थेत सुरु असणाऱ्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची निवड करताना घराणेशाही आणि जातीवाद केला जातो असा आरोप करण्यात आला आहे. 

न्यायाधीश बनण्यासाठी कोणत्याही पात्रतेची गरज नसून न्यायाधीश कुटुंबातील सदस्य अथवा जात पाहून न्यायाधीश बनविले जाते असा आरोप पत्रात केला आहे. न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी पत्रात लिहिलं आहे की, 17 व्या लोकसभेत भव्य विजय मिळवून आल्याबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन. तुमच्या या विजयानंतर हे स्पष्ट झालं की, जर तुमचं लक्ष्य स्पष्ट असेल आणि कठोर प्रयत्न केले असतील तर विजय निश्चित असतो. त्यामुळे समस्यादेखील छोट्या पडतात. या विजयानंतर भारताच्या राजकीय पटलावर असणारी घराणेशाहीचं सावट संपवलं आहे. मात्र 34 वर्षाच्या न्यायाधीश म्हणून केलेल्या कारकीर्दीत न्याय व्यवस्थेतील ज्या त्रुटी अनुभवल्या त्या तुमच्या समोर निर्दशनास आणण्यासाठी हे पत्र लिहिलं आहे. 

लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायव्यवस्था महत्वपूर्ण स्तंभ आहे. मात्र दुर्दैवाने सध्या न्याय व्यवस्थेत जातीवाद आणि घराणेशाही मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. न्यायाधीश होण्यासाठी न्यायाधीश कुटुंबातील सदस्य असणे ही पात्रता न्यायधीश नियुक्तीसाठी निश्चित करते. राजकीय कार्यकर्त्याला त्याची योग्यता सिद्ध करण्यासाठी निवडणुकीत उभं राहून जनतेचा कौल घ्यावा लागतो. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेत उतरावं लागतं मात्र हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी कोणताही मापदंड नाही असं न्यायाधीश रंगनाथ पांडेय यांनी पत्रात लिहिलं आहे. 

सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांमध्ये सुरु असलेल्या विवादाचा उल्लेख करत रंगनाथ पांडेय यांनी सांगितले की, बंद रुममधून न्यायाधीशांमधील वाद सार्वजनिक होण्याचं प्रकरण असो वा एकमेकांच्या अधिकाराबद्दल विषयाचा असो अशाप्रकारे न्याय व्यवस्थेच्या गुणवत्तेवर आणि निर्णयावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेतील या त्रुटी दूर करुन न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय