शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:34 IST

राजधानी दिल्लीत बुधवारी रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

Delhi Temperature : देशाची राजधानी दिल्लीत लोक उष्णतेने होरपळून निघाले आहेत. बुधवारी पारा ५२ अंशांच्या पुढे गेला आहे. दिल्लीत पारा ५० अंशांच्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीत मंगळवारीही पारा ५० च्या जवळ पोहोचला होता. दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट आणि अतिउष्णतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र बुधवारी उष्णतेने कहर केला. दुपारी अडीच वाजता दिल्लीत ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

दिल्लीत बुधवारी उष्णतेचे सर्व विक्रम मोडले गेले आहेत. पहिल्यांदाच दिल्लीत तापमान ५२ अंशांच्या पुढे गेलं. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीच्या मंगेशपूर भागात ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मुंगेशपुरमध्ये बुधवारी दुपारी २.३० वाजता५२ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. मंगेशपूरचे तापमान ५२.३ अंश सेल्सिअस असताना सरासरी तापमान ४५.८ अंश होते. यामुळे दिल्लीतील नागरिकांना आपण भट्टीत राहतोय की काय असा अनुभव आला.

दुसरीकडे, हवामान खात्याने बुधवारी  सांगितले की, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती ३० मे पासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्लीच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबत १ जून रोजी पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :delhiदिल्लीTemperatureतापमानHeat Strokeउष्माघातmonsoonमोसमी पाऊस