शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:02 IST

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली.

S Jaishankar briefs MPs on Bangladesh :बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर आता अंतरिम सरकार स्थापन केलं जाणार आहे. दरम्यान, बांगलादेशच्या संकटावर भारताचं बारीक लक्ष आहे. बांगलादेशबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. यासोबतच संसदीय कामकाज मंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. 

बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश - जयशंकर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. जयशंकर  म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा खास शेजारी देश आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध चांगले आहेत. शेख हसीना बांगलादेशातून पळून भारतात आल्या आहेत. त्या येथून ब्रिटन किंवा इतर कोणत्याही देशात जाऊ शकतात.

बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? बांगलादेशात मार्शल लॉ लागू झाला, तर भारत त्याचा सामना कसा करणार? बांगलादेशच्या अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल? चीन आणि पाकिस्तानची भूमिका काय असेल? याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे राजकीय पक्षांना माहिती देऊ शकतात.

परराष्ट्र मंत्री संसदेत उत्तर देतीलबांगलादेशातील सत्तापालटाच्या संदर्भात संसदेत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी मोदी सरकारला सर्व पक्षांना विश्वासात घ्यायचे आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेशातील परिस्थितीचा दिला.

राहुल गांधींनी बैठकीत विचारले 'हे' सवालबांगलादेशातील परिस्थितीमध्ये परकीय हात आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी बैठकीत केला. या परिस्थितीबाबत भारताकडे काही दीर्घकालीन योजना आहे का? बांगलादेशच्या नव्या सरकारबाबत भारताचा अॅक्शन प्लॅन काय असेल? बैठकीत इतर पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत, असे विरोधकांनी सांगितले.

काल रात्री मोदींसोबत बैठकसोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS)  बैठक झाली. बांगलादेशातील सत्तापालटाचा भारतावर काय परिणाम होईल? या विषयावर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीला उपस्थित होत्या.

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशRahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंह