शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

एकत्र राहण्यावर ठाम असलेल्या सासू-जावयाला गावात नो एन्ट्री; आली उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:00 IST

सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमधून पळून गेल्यानंतर चर्चेत आलेल्या सासू आणि जावयाची जोडी आता फक्त यूपीमध्येच नाही तर यूट्यूबवरही लोकप्रिय झाली आहे. पण आता दोघांवरही उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ आली आहे. सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही. यानंतर ते दोघे कुठे गेले याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण दोघांनीही उत्तर प्रदेश सोडल्याचं म्हटलं जात आहे.

गावात परत आल्यानंतर सासूला जावयासोबतचं राहायचं होतं. हे दोघंही एकत्र राहण्यावर ठाम होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना गावात घेतलं नाही. तसेच राहुलला त्याच्या वडिलांनी संपत्तीतून बेदखल केलं आहे. राहुलचे वडील होरीलाल यांना हे नातं मान्य नाही. माझ्यासाठी माझा मुलगा मेला आहे असं त्यांनी गावकऱ्यांसमोर म्हटलं. यानंतर दोघेही जवळच्या गावांमध्ये दोन दिवस राहिले. मग त्यांनी उत्तर प्रदेश सोडलं आणि एक नवीन जीवन सुरू केलं.

"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

पोलीस किंवा तरुणाच्या वडिलांकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केलं आहे. आमच्या कुटुंबाचा आता त्याच्याशी काहीही संबंध नाही. ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले होते. याच दरम्यान सासूने दिली  आहे. "आम्ही खूप व्हायरल झालो होतो. आमच्या बातम्या सर्वत्र सुरू होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल पाहायचो तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो" असं सासूने म्हटलं होतं. 

९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...

जावई राहुलने दिलेल्या माहितीनुसार, "९ दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेलो होतो. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. मग तिथून थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात पोहोचलो. काही दिवस तिथे राहिले आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मी मुझफ्फरपूरमध्ये माझा मोबाईल वापरला तेव्हा मी पाहिलं की दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरलो आणि नंतर खासगी गाडीने अलीगढला पोहोचलो. तिथे दादोन पोलीस ठाण्यात सरेंडर केलं." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश