शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र राहण्यावर ठाम असलेल्या सासू-जावयाला गावात नो एन्ट्री; आली उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:00 IST

सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमधून पळून गेल्यानंतर चर्चेत आलेल्या सासू आणि जावयाची जोडी आता फक्त यूपीमध्येच नाही तर यूट्यूबवरही लोकप्रिय झाली आहे. पण आता दोघांवरही उत्तर प्रदेश सोडण्याची वेळ आली आहे. सासू सपना तिचा होणारा जावई राहुलसोबत पळून गेल्यानंतर ९ दिवसांनी परत आली होती. दोघांनाही गावात प्रवेश दिला गेला नाही. यानंतर ते दोघे कुठे गेले याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण दोघांनीही उत्तर प्रदेश सोडल्याचं म्हटलं जात आहे.

गावात परत आल्यानंतर सासूला जावयासोबतचं राहायचं होतं. हे दोघंही एकत्र राहण्यावर ठाम होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना गावात घेतलं नाही. तसेच राहुलला त्याच्या वडिलांनी संपत्तीतून बेदखल केलं आहे. राहुलचे वडील होरीलाल यांना हे नातं मान्य नाही. माझ्यासाठी माझा मुलगा मेला आहे असं त्यांनी गावकऱ्यांसमोर म्हटलं. यानंतर दोघेही जवळच्या गावांमध्ये दोन दिवस राहिले. मग त्यांनी उत्तर प्रदेश सोडलं आणि एक नवीन जीवन सुरू केलं.

"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

पोलीस किंवा तरुणाच्या वडिलांकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केलं आहे. आमच्या कुटुंबाचा आता त्याच्याशी काहीही संबंध नाही. ९ दिवसांनंतर अलीगढमधील दादोन पोलीस ठाण्यात येऊन ते सरेंडर झाले होते. याच दरम्यान सासूने दिली  आहे. "आम्ही खूप व्हायरल झालो होतो. आमच्या बातम्या सर्वत्र सुरू होत्या. जेव्हा जेव्हा मोबाईल पाहायचो तेव्हा फक्त आम्हीच दिसायचो" असं सासूने म्हटलं होतं. 

९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...

जावई राहुलने दिलेल्या माहितीनुसार, "९ दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला गेलो होतो. तिथून दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. मग तिथून थेट बिहारमधील मुझफ्फरपूर शहरात पोहोचलो. काही दिवस तिथे राहिले आणि त्यानंतर नेपाळ बॉर्डरकडे जाण्याचाही विचार केला. पण जेव्हा मी मुझफ्फरपूरमध्ये माझा मोबाईल वापरला तेव्हा मी पाहिलं की दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमची सर्वत्र चर्चा होत आहे. यानंतर दोघांनीही स्वतःहून परतण्याचा निर्णय घेतला. मुजफ्फरपूरहून बस पकडली, वाटेत मथुरेच्या गया कट येथे उतरलो आणि नंतर खासगी गाडीने अलीगढला पोहोचलो. तिथे दादोन पोलीस ठाण्यात सरेंडर केलं." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश