शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 07:09 IST

पोलिसांना सतर्कतेच्या सूचना; रजा केल्या रद्द, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष

मुंबई/नवी दिल्ली : अयोध्येतील जमीन मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही येण्याची शक्यता असून, त्यानंतर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबईत अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

रजेवरील पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि रेल्वे स्थानकांवर २४ तास पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.अतिगर्दीची ठिकाणे तसेच सर्व धार्मिक स्थळे येथेही बंदोबस्त लावण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी जमू नये, याची काळजी घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. हा निकाल कधी येणार, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने त्याआधी हा निकाल लागेल, हे स्पष्ट आहे.

रेल्वे प्रवाशांचे सामान तपासण्यात हयगय करू नका, असे बजावण्यात आले आहे. स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. विमानतळांवरील प्रवासी व त्यांचे सामान यांची बारकाईने तपासणी सुरू आहे. हॉटेल व रेस्टॉरंट यांनाही सीसीटीव्ही सुरू ठेवा आणि प्रसंगी येणाºयांचे सामान तपासा, अशा सूचना दिल्या आहेत. टॅक्सी ड्रायव्हर्सनाही संशयास्पद प्रवासी वा सामान दिसल्यास पोलिसांना कळवण्याच्या सूचना आहेत.पोलीस महासंचालकांनी घेतली राज्यपालांची भेटया निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना सुरक्षेच्या उपाययोजनाची माहिती दिली. राज्यात सध्या राजकीय अस्थैर्य असल्याने अधिक काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHigh Alertहाय अलर्टPoliceपोलिस