शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 07:09 IST

पोलिसांना सतर्कतेच्या सूचना; रजा केल्या रद्द, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष

मुंबई/नवी दिल्ली : अयोध्येतील जमीन मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही येण्याची शक्यता असून, त्यानंतर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबईत अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

रजेवरील पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि रेल्वे स्थानकांवर २४ तास पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.अतिगर्दीची ठिकाणे तसेच सर्व धार्मिक स्थळे येथेही बंदोबस्त लावण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी जमू नये, याची काळजी घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. हा निकाल कधी येणार, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने त्याआधी हा निकाल लागेल, हे स्पष्ट आहे.

रेल्वे प्रवाशांचे सामान तपासण्यात हयगय करू नका, असे बजावण्यात आले आहे. स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. विमानतळांवरील प्रवासी व त्यांचे सामान यांची बारकाईने तपासणी सुरू आहे. हॉटेल व रेस्टॉरंट यांनाही सीसीटीव्ही सुरू ठेवा आणि प्रसंगी येणाºयांचे सामान तपासा, अशा सूचना दिल्या आहेत. टॅक्सी ड्रायव्हर्सनाही संशयास्पद प्रवासी वा सामान दिसल्यास पोलिसांना कळवण्याच्या सूचना आहेत.पोलीस महासंचालकांनी घेतली राज्यपालांची भेटया निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना सुरक्षेच्या उपाययोजनाची माहिती दिली. राज्यात सध्या राजकीय अस्थैर्य असल्याने अधिक काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHigh Alertहाय अलर्टPoliceपोलिस