शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

म्हणून अल कायदाचे भारतावरील हल्ले फसले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 16:00 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात इशारा

वॉशिंग्टन : आधीच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी चार हात करणाऱ्या भारतावर आत लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेचे हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालामध्ये अल कायदा भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. यासाठी अल कायदाचे इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) तयारी करत आहे. 

 अल कायदा आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनांनी भारतात आपले पाय पसरवले आहेत. काश्मीरमध्येही वेळोवेळी आयएसआयएसचे झेंडे फडविताना दिसून येतात. भारतासह आशियाई देशांमध्ये हल्ले करण्याची रणनीती या संघटनांनी बनविली आहे. युएनच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल कायदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नुकतीच वाढविलेली सुरक्षा त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरवत आहे. 

 हा अहवाल युएनच्या अल कायदा सेक्शन समितीला सोपविण्यात आला आहे. युएनचे निरिक्षण पथक आयएसआयएस आणि अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवते व याबाबतचा अहवाल प्रत्येक सहा महिन्यांनी देते. 

अल कायदा भारताच्या सुरक्षा यंत्रणांकडून एखादी चूक होण्याची वाट पाहत आहे. सुरक्षा यंत्रणेला त्यावेळी भेदून हल्ला करण्यात येणार आहे. अल कायदा पुर्वीसारखी ताकदवान राहिलेली नसली तरीही ती आशियाई देशांत आपले अस्तित्व टिकवून आहे. तसेच ती भारतात स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीची वाट पाहत आहे.

आयएसआयएल सर्वात खतरनाकया संघटनेने अफगाणिस्तानातून युरोपमध्ये हल्ले केले होते. काश्मीरमधील एका हल्ल्यातही या संघटनेचा सहभाग होता. सध्या आयएसआयएल अफगाणिस्तानात आपली पाळेमुळे रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतू, त्यांचे पाकिस्तानातही स्लीपर सेल कार्यरत आहेत.

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत