शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

“INDIA आघाडीत राहिले तर नितीश कुमार PM होतील, अन्यथा कोणाचाही नंबर लागू शकतो”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 16:29 IST

Bihar Politics Updates: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Bihar Politics Updates: बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. भाजपाशी असलेली आघाडी तोडून इंडिया आघाडीत गेलेले नितीश कुमार परत एकदा माघारी फिरण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. बिहार दुसरे सरकार स्थापन करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार एनडीएसोबत सरकार स्थापन करणार असून, २८ जानेवारी रोजी ९ व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असा दावा केला जात आहे. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली.

नितीश कुमार इंडिया आघाडीत राहिले असते तर ते पंतप्रधान होऊ शकले असते. येथे पंतप्रधानपदासाठी कोणाचाही विचार केला जाऊ शकतो. नितीश यांना इंडिया आघाडीचा समन्वयक किंवा अन्य कोणतेही मोठे पदही देता आले असते. काँग्रेस पक्षाने पुढाकार घ्यायला हवा. इंडिया आघाडीबाबत आणि नितीश कुमार यांच्याबाबत जी तत्परता दाखवायला हवी होती, ती काँग्रेसने दाखवली गेली नाही. त्याच्याशी बोलायला हवे होते. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे. कारण नितीश कुमार यांनीच पुढाकार घेऊन इंडिया आघाडीची स्थापना केली, असे अखिलेश यादव म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राहुल गांधींसोबत प्रचार करणार का, असा प्रश्न अखिलेश यादव यांना विचारण्यात आला होता. यावर, आत्ताच सांगणे कठीण आहे. त्यांच्यासोबत प्रचार करणार की नाही हे येणारा काळच सांगेल. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, त्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच भाजपा राम मंदिरावर राजकारण करत आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली. 

दरम्यान, नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने आपल्या सर्व आमदारांना पाटणामध्ये बोलावले आहेत. तसेच जेडीयूकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. २८ जानेवारी रोजी पाटणामध्ये महाराणा प्रताप रॅली होती, ही रॅलीसुद्धा रद्द करण्यात आली आहे.  तर भाजपाचे बिहारमधील सर्व प्रमुख नेते हे हायकमांडसोबत बैठकांवर बैठका घेत आहेत. एनडीएतील मित्रपक्षांच्या नेत्यांसोबतही चर्चा केली जात आहे.

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारAkhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी