शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 11:55 IST

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी तोडली आहे. तिथे स्वतंत्र लढत असून उत्तर प्रदेशच्या बहुचर्चित जागांपैकी एक असलेल्या भदोहीमध्ये मोठी चाल खेळली आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अखिलेश यादव यांनी असे का केले, याचे उत्तर शोधण्यात भले भले राजनिती तज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत. 

अखिलेश यांनी याची घोषणा करताच ममता यांनी ललितेशपती त्रिपाठी यांच्या नावाची घोषणा केली आहे. या मतदारसंघावर सपाचे वर्चस्व आहे. सपाचा गड मानला जाणारा मतदारसंघ अखिलेश यांनी टीएमसीसाठी का सोडला, असा प्रश्न सपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. 

भदोही लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये ज्ञानपुर, भदोही आणि औराई हे जिल्ह्यातील तर प्रयागराज जिल्ह्यातील प्रतापपुर आणि हंडिया असे पाच मतदारसंघ आहेत. महत्वाचे म्हणजे या मतदारसंघात ब्राम्हण मतदारांची मते निर्णायक ठरतात. जवळपास तीन लाख ब्राम्हण मतदार आहेत. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी मतदारसंघही जवळ आहे. 

ललितेशपती त्रिपाठी कोण?अखिलेश यांनी हा मतदारसंघ का सोडला? य़ाच्यामागे अनेक समीकरणे आहेत. परंतु आणखी एक समीकरण म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचे ते नातू आहेत. ललितेश हे काँग्रेसच्या तिकीटावर मिर्झापूरच्या मदिहान मतदारसंघातून आमदार होते. वाराणसी भागात कमलापती त्रिपाठी यांचे घर राजकीय केंद्र होते. 2021 मध्ये ललितेश यांनी काँग्रेस सोडली होती. प्रियंका गांधी यांचे ते जवळचे मानले जायचे. २०१९ मध्ये ते लोकसभा निवडणूक हरले होते. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४