शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Akhilesh Yadav : "मिसाईल बनवण्याचं स्वप्न दाखवलं पण आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बही बनवला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 11:19 IST

Akhilesh Yadav And BJP : अखिलेश यादव यांनी रविवारी जातनिहाय जनगणनेबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी जातनिहाय जनगणनेबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. लोकांना जातीच्या आधारावर समानतेपासून वंचित ठेवून भावनांशी खेळल्याचा गंभीर आरोप भाजपावर केला आहे. बुंदेलखंड प्रदेशातील संरक्षण उद्योगांशी संबंधित भाजपा सरकारच्या घोषणांवर अखिलेश यांनी जोरदार टीका केली आहे. 

"बुंदेलखंडच्या या लोकांना हे समजलं की भाजपाने मोठी स्वप्नं दाखवली आहेत. दिल्लीतील लोक आले आणि म्हणाले की, उत्तर प्रदेशात मिसाईल तयार केलं जाईल. आज आम्ही 10 वर्षे मागे वळून पाहतो, तेव्हा ज्यांनी टँक, बॉम्ब बनवण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी आतापर्यंत साधा सुतळी बॉम्बसुद्धा तयार केला नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

अखिलेश यांनी बेरोजगारी आणि शेतकर्‍यांच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीबद्दल भाजपावर हल्लाबोल केला. अखिलेश यादव फिरोजाबादच्या तुंडला येथील पाल, बघेल आणि धनगर समाज यांच्या विभागीय महापंचायतमध्ये सामील होण्यासाठी आले होते. ते म्हणाले की, आज संपूर्ण देशातील लोक जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आले आहेत. मंडल आयोग तथा संविधानाच्या भावनांशी खेळण्याचं काम भाजपाच्या लोकांनी केलं आहे.

"सामाजिक न्यायाची लढाई केवळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल तेव्हाच पूर्ण होईल आणि लोकांना प्रमाणित हक्क मिळतील. हा लढा मोठा आहे. मागास आणि दलितांना त्यांचे हक्क द्यावे लागतील. लोकांना सामाजिक न्यायाचा फायदा होईल. आम्ही फक्त पाल, बघेल आणि धनगर समुदायाच्या हितासाठी लढा देणार नाही, परंतु या संदर्भात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, जेणेकरून लोकांना लोकसंख्येनुसार त्यांचे हक्क दिले जाऊ शकतात" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा