शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Ajmer Sharif on PFI Ban: पीएफआयवर केंद्राचा 'सर्जिकल स्ट्राईक', आता अजमेर शरीफ दर्ग्यातून आली मोठी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 14:05 IST

"ही कारवाई कायदेशीरपणे आणि दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्वांनी स्वागत करायला हवे."

केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि तिच्याशी संबंधित संघटनांवर बंदी घातली आहे. यानंतर आता अजमेर दर्ग्याचे आध्यात्मिक प्रमुख जैनुल आबेदीन अली खान यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, ही कारवाई कायदेशीरपणे आणि दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आली आहे. या कारवाईचे सर्वांनी स्वागत करायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

'देश सुरक्षित तर आपण सुरक्षित' -खान म्हणाले, 'जर देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहोत, देश कुठल्याही संस्थेपेक्षा अथवा विचारापेक्षा मोठा आहे. यामुळे जर कुणी हा देश, येथील एकता आणि सार्वभौमत्व अथवा देशाची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला या देशात राहण्याचा मुळीच अधिकार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पीएफआयच्या देश विरोधी कारवायांसंदर्भात बातम्या येत आहेत आणि पीएफआयवर घालण्यात आलेली बंदी ही देश हिताची आहे. एवढेच नाही, तर मी स्वतः दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा सरकारकडे पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती,' असेही ते म्हणाले. केंद्र सरकारनेदहशतवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप करत पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) बंदी घातली आहे.

गृह मंत्रालयानं घातली बंदी -केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे, की "पीएफआय आणि त्यांचे सहकारी अशा प्रकारच्या विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी आहेत, ज्यामुळे पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन प्रभावित  झाले आहे. देशाचा घटनात्मक ढाचा कमकुवत करण्याचा, दहशतवादी शासनाला प्रोत्साहन देण्याचा आणि ते लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे केंद्र सरकारचे मत आहे, की पीएफआय आणि तिच्याशी संबंधित संघटनांना तत्काळ बेकायदेशीर संघटना घोषित करणे आवश्यक आहे.

या संघटनांवर घालण्यात आली आहे बंदी -- पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया- रिहैब इंडिया फाउंडेशन- कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया- ऑल इंडिया इमाम काउंसिल- NCHRO- नॅशनल वुमन्स फ्रंट - ज्युनियर फ्रंट - एम्वायर इंडिया फाउंडेशन- रिहैब फाउंडेशन (केरळ) 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारTerrorismदहशतवाद