शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:09 IST

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले.

ग्वाल्हेर : कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले. १९९९ मध्ये झालेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांचे नाट्य रूपांतर यात सादर करण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरच्या द्रास-कारगिल भागातील टायगर हिल हल्ल्याचे प्रतीकात्मक रूपांतरण करण्यात आले आहे. युद्धातील महत्त्वपूर्ण घटना पुन्हा उभ्या करण्यासाठी हवाई दलाने मिराज २००० विमान आणि स्फोटकांचा वापर केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी एअर चीफ मार्शल बीएस धनोआ होते.भारतीय हवाई दलाने युद्धाची २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विमानतळावरील प्रदर्शनात पाच मिराज २०००, दोन मिग २१ आणि एक सुखोई ३० एमकेआय तैनात करण्यात आले आहे. २००० मिराजपैकी एकात बॉम्बवाहक दाखविण्यात आले आहे. या बॉम्बचा उपयोग फेब्रुवारीत बालाकोटमध्ये हवाई हल्ल्यात करण्यात आला होता.हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कारगिल युद्ध म्हणजे उंच पहाडी भागात हवाई दलाच्या शक्तीचा एक अनुभव होता. आॅपरेशन विजयमध्ये सहभागी असलेले वीरता पुरस्कार प्राप्त करणारे सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. (वृत्तसंस्था)एएन-३२ विमानांचा वापर तूर्त अपरिहार्यग्वाल्हेर : जुन्या झालेल्या व वारंवार अपघात होणाºया अवजड मालवाहू एएन-३२ विमानांना पर्याय म्हणून नवी विमाने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत नवी विमाने येत नाहीत तोपर्यंत एएन-३२ विमानांचा वापर सुरू ठेवण्याखेरीज आमच्यापुढे अन्य पर्याय नाही, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. ए. धनोआ यांनी सोमवारी येथे सांगितले. कारगिल युद्धाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त येथील हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात धनोआ बोलत होते. ते म्हणाले की, उंच पहाडी प्रदेशात लष्करी साहित्य पोहोचविण्यासाठी हवाई दलाला सध्या तरी एएन-३२ विमानेच वापरणे भाग आहे. पर्याय म्हणून घेण्यात येत असलेली विमाने दाखल झाली की ती या कामासाठी वापरून एएन-३२ प्रशिक्षणासाठी वापरली जातील. हवाई दलातील मिराज लढाऊ विमानांचा ग्वाल्हेर हा मुख्य तळ आहे. याच मिराज विमानांनी ‘टायगर हिल’वर अचूक मारा केल्याने कारगिल युद्धास निर्णायक कलाटणी मिळाली, याचे हवाई दलाच्या प्रमुखांनी गौरवाने स्मरण दिले. बालाकोट ‘एअर स्ट्राईक’साठीही मिराज विमानेच वापरली गेली होती आणि मिराज विमाने हाच आजही हवाई दलाचा मुख्य मारक ताफा आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत