शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 04:09 IST

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले.

ग्वाल्हेर : कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले. १९९९ मध्ये झालेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांचे नाट्य रूपांतर यात सादर करण्यात आले आहे.जम्मू-काश्मीरच्या द्रास-कारगिल भागातील टायगर हिल हल्ल्याचे प्रतीकात्मक रूपांतरण करण्यात आले आहे. युद्धातील महत्त्वपूर्ण घटना पुन्हा उभ्या करण्यासाठी हवाई दलाने मिराज २००० विमान आणि स्फोटकांचा वापर केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी एअर चीफ मार्शल बीएस धनोआ होते.भारतीय हवाई दलाने युद्धाची २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विमानतळावरील प्रदर्शनात पाच मिराज २०००, दोन मिग २१ आणि एक सुखोई ३० एमकेआय तैनात करण्यात आले आहे. २००० मिराजपैकी एकात बॉम्बवाहक दाखविण्यात आले आहे. या बॉम्बचा उपयोग फेब्रुवारीत बालाकोटमध्ये हवाई हल्ल्यात करण्यात आला होता.हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कारगिल युद्ध म्हणजे उंच पहाडी भागात हवाई दलाच्या शक्तीचा एक अनुभव होता. आॅपरेशन विजयमध्ये सहभागी असलेले वीरता पुरस्कार प्राप्त करणारे सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. (वृत्तसंस्था)एएन-३२ विमानांचा वापर तूर्त अपरिहार्यग्वाल्हेर : जुन्या झालेल्या व वारंवार अपघात होणाºया अवजड मालवाहू एएन-३२ विमानांना पर्याय म्हणून नवी विमाने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत नवी विमाने येत नाहीत तोपर्यंत एएन-३२ विमानांचा वापर सुरू ठेवण्याखेरीज आमच्यापुढे अन्य पर्याय नाही, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. ए. धनोआ यांनी सोमवारी येथे सांगितले. कारगिल युद्धाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त येथील हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात धनोआ बोलत होते. ते म्हणाले की, उंच पहाडी प्रदेशात लष्करी साहित्य पोहोचविण्यासाठी हवाई दलाला सध्या तरी एएन-३२ विमानेच वापरणे भाग आहे. पर्याय म्हणून घेण्यात येत असलेली विमाने दाखल झाली की ती या कामासाठी वापरून एएन-३२ प्रशिक्षणासाठी वापरली जातील. हवाई दलातील मिराज लढाऊ विमानांचा ग्वाल्हेर हा मुख्य तळ आहे. याच मिराज विमानांनी ‘टायगर हिल’वर अचूक मारा केल्याने कारगिल युद्धास निर्णायक कलाटणी मिळाली, याचे हवाई दलाच्या प्रमुखांनी गौरवाने स्मरण दिले. बालाकोट ‘एअर स्ट्राईक’साठीही मिराज विमानेच वापरली गेली होती आणि मिराज विमाने हाच आजही हवाई दलाचा मुख्य मारक ताफा आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत