शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोरोना नाही तरीही भारतात दरदिवशी होतात ६५०० मृत्यू; ताज्या रिपोर्टनं खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 10:55 IST

हवेच्या प्रदूषणामुळे भारतात २०१९ मध्ये १७ लाख तर चीनमध्ये १८ लाख मृत्यू झाले.

कोरोना महामारी जेव्हा पीकवर होती तेव्हा आपल्या देशात दिवसाला ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आले होते. या महामारीनं असे दिवस लोकांसमोर उभे केले. जे आठवून आजही अंगावर काटा येत आहे. परंतु कोरोना नाही तरी भारतात दिवसाला ६ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याला कारणही अतिशय भयंकर आहे ज्याचा आपण विचारही करत नाही.

या मृत्यूचं कारण आहे प्रदूषण. लोक प्रदूषणाला खूप हलक्यात घेतात आणि त्याची जबाबदारी सरकारवर झटकून टाकतात. प्रदूषण आणि आरोग्य याबाबत लांसेट आयोगाच्या ताज्या रिपोर्टनं खळबळ माजली आहे. त्यानुसार जगातील ६ पैकी १ मृत्यू वेगवेगळ्या प्रदूषणामुळे होत असल्याचं सांगण्यात आले आहे. २०१९ मध्ये भारतात प्रदूषणामुळे २४ लाख, चीनमध्ये २२ लाख तर जगात एकूण ९० लाख मृत्यू झाल्याचं आढळलं आहे. Lancet चा अंदाज वर्तवतो की, २०१९ मध्ये हवा, पाणी आणि व्यवसायासंबंधित प्रदूषणामुळे जगात ९० लाख मृत्यू झालेत.

जलवायू परिवर्तनावर अनेक बड्या चर्चा झाल्या तरी २०१५ पासून मागील आकडेवारीचा विचार करता अद्याप मृत्यूमध्ये अंतर आले नाही. भारतात प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. परंतु १५ देशांच्या तुलनेने डेथ रेट कमी आहे. लांसेट रिपोर्टमध्ये १ लाखांच्या लोकसंख्येवर १६९.५ मृत्यूसह भारत १६ व्या स्थानी आहे. चीनमध्ये २०१५ साली प्रदूषणामुळे १८ लाख लोकांचा मृत्यू झाला होता तर २०१९ मध्ये मृत्यूंचा आकड्यात वाढ होऊन २१.७ लाखांपर्यंत पोहचला. भारतात वायू प्रदूषण सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. २०१९ मध्ये वायू प्रदूषणामुळे १६ लाख, जल प्रदूषणामुळे ५ लाख तर व्यवसायांमुळे होणारे प्रदूषणामुळे १.६ लाख मृत्यू झाले.

हवेच्या प्रदूषणामुळे भारतात २०१९ मध्ये १७ लाख तर चीनमध्ये १८ लाख मृत्यू झाले. दिल्लीतील नॅच्युरल रिसोर्स डिफेंन्स काऊन्सिलचे पोलाश मुखर्जी म्हणाले की, केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण भारतात हवा प्रदूषण खूप भयंकर होत चाललं आहे. लांसेट स्टडीत त्याचा समावेश नाही. हवेतील गुणवत्ता मानकांना लागू करण्यात आपण अयशस्वी राहिलो. अशावेळी कमीत कमी स्वच्छ इंधनावर जोर द्यायला हवा परंतु प्रत्यक्षात प्रदूषणाबाबत दुर्लक्ष केले जात आहे. लांसेट स्टडीवरून हे स्पष्ट होते की, जागरुकता आणूनही प्रदूषणाबाबत मृत्यूमध्ये घट झाली नाही. विषारी हवा, रासायनिक प्रदूषणसारख्या विविध प्रदूषणामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. रिपोर्टनुसार १८ लाख मृत्यू विषारी रासायनिक प्रदूषणामुळे झाले आहेत.  

टॅग्स :pollutionप्रदूषण