शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Pollution Level: दिल्लीत वायू प्रदूषणामुळे दरवर्षी १५ लाख जणांचा मृत्यू, प्रत्येकाचं ९ वर्षांनी घटतंय आयुष्य; धक्कादायक अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 17:55 IST

Delhi Pollution Level: देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी तब्बल १५ जणांचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला ...

Delhi Pollution Level: देशाची राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी तब्बल १५ जणांचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. इतकंच नव्हे, तर दिल्लीत राहत असलेल्या लोकांचं वायू प्रदूषणाच्या समस्येमुळे ९.५ वर्षांनी आयुष्य कमी होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लंग्स केअर फाऊंडेशनच्या दाव्यानुसार दिल्लीत प्रत्येक तिसऱ्या लहान मुलामागे एकाला अस्थमाचा त्रास आहे. आधीच वायू प्रदूषणाची समस्या गंभीर असताना दिल्ली आणि एनसीआर भागात दिवाळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. ज्यानंतर हवेची गुणवत्ता अतिशय गंभीर श्रेणीत येऊन पोहोचली आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाचा ५ वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे. 

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनीही दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून प्रदूषणाचा स्तर वाढला असल्याची कबुली दिली आहे. यामागची दोन कारणं देखील सांगण्यात आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दिल्ली व एनसीआर भागात पेंढा जाळण्यास सुरुवात होते. जवळपास ३५०० ठिकाणी पेंढा जाळण्यात आल्याची माहिती समोर आळी आहे. दुसरीकडे दिवाळीच्या निमित्तानं फटाके फोडण्याचंही प्रमाण वाढतं. यामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. 

थंडी वाढल्यानं प्रदूषण वाढते यामागे कोणतंही तथ्य नसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. पेंढा जाळण्याच्या घटना वाढल्या आहेत आणि आतषबाजी याचाच हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात हवेचा स्तर थोडा सुधारण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात दिल्लीतील हवेची गुणवत्ता अतिशय खालच्या पातळीवय येऊन पोहोचते. २०१६ साली दिल्लीतील हवेच्या मुलांक ४३१ पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर एका वर्षानंतर यात घट होऊन २०१७ साली ३१९ इतका होता. पण हा स्तरही घातकच समजला जातो. २०१८ साली ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर २८१ इतका होता. तर २०१९ रोजी ३३७ वर पोहोचला होता. २०२० मध्ये १४ नोव्हेंबरमध्ये हाच आकडा ४१४ इतका झाला होता. यावेळी तर नवा रेकॉर्ड प्रस्थापित करत हवेच्या गुणवत्तेचा स्तर तब्बल ५३३ वर पोहोचला आहे. 

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणair pollutionवायू प्रदूषण