शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 23:51 IST

Air Marshal AK Bharti: ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे.

Air Marshal AK Bharti: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ रावबत भारताने प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानचा प्रत्येक वार भारताने नष्ट केला. यानंतर युद्धविराम घोषित करण्यात आला. परंतु, पाकिस्तानने त्याला केराची टोपली दाखवत काहीच तासांत पुन्हा भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले केले. हेही हल्ले भारताने यशस्वीरित्या परतवून लावले. पाकिस्तानचा कुठलाच डाव भारताने यशस्वी होऊ दिला नाही. यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलाने आज पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सविस्तर माहिती दिली. 

या पत्रकार परिषदेत एअर मार्शल एके भारती यांना भारताने केलेल्या कारवाईत पाक सैन्याची किती जीवितहानी झाली, किती दहशतवादी मारले गेले, अशा आशयाचा प्रश्न विचारला. यावर काहीशा स्पष्ट भाषेत एअर मार्शल एके भारती यांनी उत्तर दिले. आमचे काम केवळ दिलेल्या टार्गेटचा लक्ष्यभेद करणे आहे. किती जण मारले गेले, याची मोजदाद ठेवणे नाही. या कारवाईसाठी आम्ही जी योजना आणि पद्धत अवलंबली, त्याचा शत्रू राष्ट्रावर मोठा प्रभाव पडला आहे. किती जण मारले गेले? किती जण जखमी झाले? आमचा उद्देश हा नव्हता. मात्र, जर असे काही झाले असेल, तर त्याची मोजदाद करणे त्यांचे काम आहे, असे एके भारती यांनी सडेतोडपणे सांगितले.

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये लक्ष्यभेद करण्यासाठी वायुसेनेने कोणती शस्त्रे वापरली?

या पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये लक्ष्यभेद करण्यासाठी वायुसेनेने कोणती शस्त्रे वापरली, असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना एके भारती म्हणाले की, या कारवाईत आम्ही कोणती शस्त्रे वापरली, याबाबत कुठेही काही सांगितले नाही. दुसरीकडे, डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ७ मे रोजी ओळख पटवण्यात आलेल्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. तसेच त्यांनी सांगितले की भारताने केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य झाले. तसेच ऑपरेशन सिंदूरमुळे झालेला परिणाम जगासमोर स्पष्ट आहे. दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य झाले का? आपण असे विचारलं तर याचे उत्तर हो असे आहे, तसेच त्याचे परिणाम जगासमोर आहेत, असेही एके भारती यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान