शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:05 IST

खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र...

एअर इंडियामागची पीडा काही संपताना दिसत नाही. या कंपनीच्या विमानांमध्ये सातत्याने, काही ना काही समस्या येतच आहेत. दरम्यान, आता दिल्लीहून रायपूरला पोहोचलेल्या एका एअर इंडियाच्या विमानाचे दरवाजेच लवकर उघडले नाही. यामुळे प्रवासी तासभर विमानातच अडकून राहिले, असे वृत्त आहे.

रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावरील घटना -खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र, विमानतळावर उतरल्यानंतरही विमानाचा दरवाजाच उघडला नाही, यामुळे प्रवासी जवळपास तासभर विमानातच अडकून होते. यानंतर, प्रवाशांना कसेतरी बाहेर काढण्यात आले.

तांत्रिक बिघाड अन् प्रवासी अस्वस्थ -सांगण्यात येते की, बराच वेळ दरवाजा न उघडल्याने एअरलाइन कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी रात्री ११ वाजेपर्यंत विमानातच अडून होते. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरणही दिसून आले. बिलासपूर जिल्ह्यातील कोटा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अटल श्रीवास्तवही या सर्व प्रवाशांसोबत विमानात होते.

...म्हणून प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली - पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरुवातीला केबिन क्रूने यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. एका प्रवाशाने सांगितले की, काही वेळ कुठल्याच प्रकारचे संभाषण झाले नाही. गेल्या काही दिवसांत झालेल्या विमान घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. महत्वाचे म्हणजे,या प्रकरणासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाpassengerप्रवासीAirportविमानतळChhattisgarhछत्तीसगड