शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:05 IST

खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र...

एअर इंडियामागची पीडा काही संपताना दिसत नाही. या कंपनीच्या विमानांमध्ये सातत्याने, काही ना काही समस्या येतच आहेत. दरम्यान, आता दिल्लीहून रायपूरला पोहोचलेल्या एका एअर इंडियाच्या विमानाचे दरवाजेच लवकर उघडले नाही. यामुळे प्रवासी तासभर विमानातच अडकून राहिले, असे वृत्त आहे.

रायपूरमधील स्वामी विवेकानंद विमानतळावरील घटना -खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र, विमानतळावर उतरल्यानंतरही विमानाचा दरवाजाच उघडला नाही, यामुळे प्रवासी जवळपास तासभर विमानातच अडकून होते. यानंतर, प्रवाशांना कसेतरी बाहेर काढण्यात आले.

तांत्रिक बिघाड अन् प्रवासी अस्वस्थ -सांगण्यात येते की, बराच वेळ दरवाजा न उघडल्याने एअरलाइन कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी रात्री ११ वाजेपर्यंत विमानातच अडून होते. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरणही दिसून आले. बिलासपूर जिल्ह्यातील कोटा मतदारसंघातील काँग्रेस आमदार अटल श्रीवास्तवही या सर्व प्रवाशांसोबत विमानात होते.

...म्हणून प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली - पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरुवातीला केबिन क्रूने यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. एका प्रवाशाने सांगितले की, काही वेळ कुठल्याच प्रकारचे संभाषण झाले नाही. गेल्या काही दिवसांत झालेल्या विमान घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. महत्वाचे म्हणजे,या प्रकरणासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाpassengerप्रवासीAirportविमानतळChhattisgarhछत्तीसगड