शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एअर इंडियाचा भोंगळ कारभार, आसन संख्येपेक्षा अधिकची तिकिटं दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 10:54 IST

एअर इंडियाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नवी दिल्लीः एअर इंडियाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एअर इंडिया या विमान कंपनीनं दिल्ली-गुवाहाटी या विमानानं प्रवास करणाऱ्या 20 प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे बोर्डिंग पास देण्यास नकार दिलेल्या त्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट होते. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियानं प्रवासी आसन व्यवस्थेहून अधिक तिकिटं बुक केली आहेत. त्यामुळे ऊर्वरित प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात आलेला नाही. बोर्डिंग पास न दिल्यानं प्रवाशांनी एअरपोर्टवरच घोषणाबाजी सुरू केली. त्या प्रवाशांवर आता तिकीट रद्द करण्याचा दबाव टाकला जातोय.तर गेल्या काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने शेवटच्या क्षणी होणा-या तिकीट बुकिंगसाठी मोठी सूट अधिकृतरीत्या जाहीर केली होती. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली होती. सवलतीचा नेमका आकडा निवेदनात देण्यात आलेला नाही. तथापि एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी होणा-या बुकिंगवर एअर इंडियाकडून सरसकट 50 टक्के सूट देण्यात येत होती. जेट एअरवेज जमिनीवर आल्यानंतर विमान तिकिटे प्रचंड महागली आहेत. ऐनवेळच्या प्रवासासाठी तर विमान कंपन्या अवाच्या सव्वा दर आकारत आहेत. या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या हंगामात ही प्रवाशांसाठी बंपर ऑफर ठरत होती.सूत्रांच्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी केल्या जाणा-या विमान तिकिटाच्या बुकिंगवर प्रवाशांना सामान्यत: सुमारे 40 टक्के जास्त पैसे मोजावे लागतात. काही कंपन्या तर त्यापेक्षाही जास्त रक्कम आकारतात. जेट एअरवेज बंद पडल्यानंतर तिकिटांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात नेहमीच्या तफावतीपेक्षा अधिक तफावत निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया