शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

घटना जशी हाताळावी तशी ...; टाटा समुहाच्या अध्यक्षांचे लघुशंका प्रकरणावर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 21:47 IST

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केलेल्या प्रकरणावर  प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी एअर इंडियाची कारवाई वेगवान असायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाने महिलेवर लघुशंका केलेल्या प्रकरणावर  प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी एअर इंडियाची कारवाई वेगवान असायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

एन चंद्रशेखरन यांनी एका निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'आम्ही या परिस्थितीला ज्या प्रकारे हाताळायला हवे होते त्या पद्धतीने आम्ही हाताळले नाही. यापूर्वी, हवाई वाहतूक उद्योगावर देखरेख ठेवणारी सरकारी संस्था डीजीसीएने याप्रकरणी एअर इंडियाला फटकारले होते. यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचे हे वक्तव्य आले आहे. 

'या प्रकरणी एअर इंडियाची प्रतिक्रिया जलद आणि तत्काळ असायला हवी होती. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप केला होता. पीडित महिला ज्येष्ठ नागरिक असून तिचे वय ७० पेक्षा जास्त आहे. बिझनेस क्लासमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी बेंगळुरू येथून अटक केली.

ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये येताच प्रचंड खळबळ उडाली. "26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI102 ची घटना ही माझ्यासाठी आणि एअर इंडियामधील माझ्या सहकाऱ्यांसाठी वैयक्तिक वेदनादायक बाब आहे. एअर इंडियाचा प्रतिसाद खूप असायला हवा होता. जलद. आम्ही ही परिस्थिती जशी हवी तशी हाताळण्यात अयशस्वी झालो, असंही अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले. 

'एकेकाळी सरकारी क्षेत्रातील विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाला काही महिन्यांपूर्वी टाटा समूहाने भारत सरकारकडून विकत घेतली. टाटा समूह आणि एअर इंडिया त्यांच्या प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेसाठी अत्यंत प्रामाणिकपणे वचनबद्ध आहेत. या स्वरूपाच्या कोणत्याही घटना टाळण्यासाठी किंवा निराकरण करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रक्रियेचे पुनरावलोकन करू. आरोपी प्रवाशाला 30 दिवसांसाठी उड्डाण करण्यास बंदी घातली आहे आणि परिस्थिती हाताळण्यात कर्मचाऱ्यांकडून चूक झाली की नाही याची चौकशी करण्यासाठी अंतर्गत पॅनेल स्थापन केले आहे, असंही एन चंद्रशेखरन म्हणाले. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया