शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:53 IST

Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे. 

Air India Plane Crash Updates: दिल्लीवरून लंडनकडे जाणारे विमानअहमदाबादच्याविमानतळावर उतरले. त्यानंतर काही वेळातच ते तिथून लंडनच्या दिशेने झेपावले, पण काळाने झडप घातली आणि काही वेळात जळून खाक झाले. अनेक प्रवासी मरण पावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात झाला तेव्हा विमानात १२ क्रू मेंबर्ससह २४२ जण होते. याबद्दलची अधिक माहिती आता समोर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे एआय१७१ बोईंग विमान अहमदाबाद विमानतळापासून १५ किमी अंतरावर कोसळले. विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, विमानातील प्रवाशांबद्दल माहिती आली आहे. 

विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक?

लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या या विमानामध्ये १६९ भारतीय नागरिक होते. तर ५३ नागरिक ब्रिटनचे होते. प्रवासी १ कॅनडाचा होता. तर ७ पोर्तुगीजे नागरिक होते. 

वाचा >>पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

या विमानात स्त्री आणि पुरुष मिळून एकूण २१७ प्रौढ प्रवासी होते. तर ११ लहान मुले होते, तर दोन बालके होती.

एअर इंडिया विमान अपघात: प्रवाशांची संपूर्ण यादी

वसतिगृहावर कोसळले विमान

एअर इंडियाचे हे विमान मेघानीनगर भागात पडले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, तिथे विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्य़ांचे वसतिगृह या इमारतीत असून, इमारतीचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे वसतिगृहातही जीवित हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते. बचाव व मदत कार्यासाठी तातडीने एनडीआरएफच्या जवानांच्या तीन तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. ९० जवान गांधीनगरवरून अपघातस्थळी येत आहेत. त्याचबरोबर वडोदऱ्यावरूनही तीन तुकड्या पाठवल्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाairplaneविमान