शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:53 IST

Air India plane crash News: एअर इंडियाचे विमान गुजरातमध्ये कोसळले. अपघात झाला, त्यावेळी तब्बल २४२ जण होते. यात किती भारतीय आणि किती परदेशी, तसेच इतर माहिती समोर आली आहे. 

Air India Plane Crash Updates: दिल्लीवरून लंडनकडे जाणारे विमानअहमदाबादच्याविमानतळावर उतरले. त्यानंतर काही वेळातच ते तिथून लंडनच्या दिशेने झेपावले, पण काळाने झडप घातली आणि काही वेळात जळून खाक झाले. अनेक प्रवासी मरण पावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात झाला तेव्हा विमानात १२ क्रू मेंबर्ससह २४२ जण होते. याबद्दलची अधिक माहिती आता समोर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे एआय१७१ बोईंग विमान अहमदाबाद विमानतळापासून १५ किमी अंतरावर कोसळले. विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, विमानातील प्रवाशांबद्दल माहिती आली आहे. 

विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक?

लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या या विमानामध्ये १६९ भारतीय नागरिक होते. तर ५३ नागरिक ब्रिटनचे होते. प्रवासी १ कॅनडाचा होता. तर ७ पोर्तुगीजे नागरिक होते. 

वाचा >>पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका

या विमानात स्त्री आणि पुरुष मिळून एकूण २१७ प्रौढ प्रवासी होते. तर ११ लहान मुले होते, तर दोन बालके होती.

एअर इंडिया विमान अपघात: प्रवाशांची संपूर्ण यादी

वसतिगृहावर कोसळले विमान

एअर इंडियाचे हे विमान मेघानीनगर भागात पडले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, तिथे विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्य़ांचे वसतिगृह या इमारतीत असून, इमारतीचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे वसतिगृहातही जीवित हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते. बचाव व मदत कार्यासाठी तातडीने एनडीआरएफच्या जवानांच्या तीन तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. ९० जवान गांधीनगरवरून अपघातस्थळी येत आहेत. त्याचबरोबर वडोदऱ्यावरूनही तीन तुकड्या पाठवल्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाairplaneविमान