शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 09:23 IST

Air India Plane Crash: एन चंद्रशेखर यांच्यासोबत ही बैठक झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, सचिव समीर कुमार सिन्हा आणि डीजीसीए प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी शुक्रवारी ही बैठक घेतली.

अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया कंपनीतील गैरकारभार समोर येऊ लागला आहे. टाटा सन्स आणि एअर इंडियाच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कठोर शब्दांत सुनावले आहे. यामध्ये ज्यांना पदावर बसविले आहे त्यांनाच निर्णय घेऊ द्या, पाठीमागून निर्णय घेऊ नका असा मोठा संदेश दिला आहे. 

एन चंद्रशेखर यांच्यासोबत ही बैठक झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, सचिव समीर कुमार सिन्हा आणि डीजीसीए प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी शुक्रवारी ही बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा सुधारण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली, ज्यावर चंद्रशेखरन यांनी सहमती दर्शवली आहे. 

एअर इंडियाच्या प्रमुख विभागांमध्ये सुरक्षिततेवर थेट परिणाम करणारी मागील सीटवरून गाडी चालवण्याची संस्कृती तात्काळ बंद केली पाहिजे, अशा शब्दांत सरकारने चंद्रशेखर यांना समज दिली आहे. तसेच महत्त्वाच्या विभागांमधील लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे, काही घडल्यास गोष्टी चुकीच्या झाल्यास त्यांना दोषी ठरवले जाऊ नये. बऱ्याच प्रकरणांमध्ये कोणीतरी दुसराच त्या पदावरील अधिकाऱ्यांचे निर्णय घेत असतो. ही व्यवस्था अत्यंत चुकीची आणि धोकादायक आहे. ती तातडीने बंद करायला हवी, असे सरकारने सुनावले आहे. 

एअर इंडियाच्या गुरुग्राम कार्यालयात अपघातग्रस्त विमानांचे सामान ठेवले जात होते. या कार्यालयात सीट, उपकरणे आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. जरी त्याचा उद्देश सुरक्षिततेची गरज लक्षात आणून देणे असला तरी, मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना ते आवडत नाही, असेही एअर इंडियाला सांगण्यात आले आहे. अर्थात या गोष्टी सरकारकडे कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे पोहोचविलेल्या असण्याची शक्यता अधिक आहे. एकंदरीतच एअर इंडियाच्या वर्क कल्चरवरून सरकार गंभीर आहे, हे यावरून दिसत आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाTataटाटाCentral Governmentकेंद्र सरकार