शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:25 IST

Air India Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे.

Air India Plane Crash :  अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विमान अपघाताच्या चौकशीत मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याची संयुक्त राष्ट्रांची मागणी भारताने फेटाळून लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत हे मान्य करणार नाही. ब्लॅक बॉक्स डेटाच्या विश्लेषणात विलंब केल्याबद्दल काही सुरक्षा तज्ञांनी टीका केली होती.

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर अपघातानंतर, यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता, संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक संस्थेने त्यांच्या एका तपासकर्त्याला चौकशीत मदत करण्यासाठी भारताला प्रस्ताव दिला होता.

यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) २०१४ मध्ये मलेशियन विमान बेपत्ता झाल्याच्या चौकशी आणि नंतर २०२० मध्ये युक्रेनियन जेटलाइनरच्या चौकशीसारख्या काही तपासात मदत करण्यासाठी तपासकर्त्यांना तैनात केले होते. 

ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे. 

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

अहवाल कधी मिळेल?

रेकॉर्डर्स भारतात वाचले जातील की अमेरिकेत, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. विभाग आयसीएओच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. बहुतेक हवाई अपघात अनेक कारणांमुळे होतात आणि अपघातानंतर सुमारे ३० दिवसांनी प्राथमिक अहवाल प्राप्त होतो.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना