शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:25 IST

Air India Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे.

Air India Plane Crash :  अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विमान अपघाताच्या चौकशीत मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याची संयुक्त राष्ट्रांची मागणी भारताने फेटाळून लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत हे मान्य करणार नाही. ब्लॅक बॉक्स डेटाच्या विश्लेषणात विलंब केल्याबद्दल काही सुरक्षा तज्ञांनी टीका केली होती.

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर अपघातानंतर, यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता, संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक संस्थेने त्यांच्या एका तपासकर्त्याला चौकशीत मदत करण्यासाठी भारताला प्रस्ताव दिला होता.

यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) २०१४ मध्ये मलेशियन विमान बेपत्ता झाल्याच्या चौकशी आणि नंतर २०२० मध्ये युक्रेनियन जेटलाइनरच्या चौकशीसारख्या काही तपासात मदत करण्यासाठी तपासकर्त्यांना तैनात केले होते. 

ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे. 

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

अहवाल कधी मिळेल?

रेकॉर्डर्स भारतात वाचले जातील की अमेरिकेत, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. विभाग आयसीएओच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. बहुतेक हवाई अपघात अनेक कारणांमुळे होतात आणि अपघातानंतर सुमारे ३० दिवसांनी प्राथमिक अहवाल प्राप्त होतो.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना