शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:25 IST

Air India Plane Crash: १२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव भारताने फेटाळला आहे.

Air India Plane Crash :  अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विमान अपघाताच्या चौकशीत मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याची संयुक्त राष्ट्रांची मागणी भारताने फेटाळून लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत हे मान्य करणार नाही. ब्लॅक बॉक्स डेटाच्या विश्लेषणात विलंब केल्याबद्दल काही सुरक्षा तज्ञांनी टीका केली होती.

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर अपघातानंतर, यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता, संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक संस्थेने त्यांच्या एका तपासकर्त्याला चौकशीत मदत करण्यासाठी भारताला प्रस्ताव दिला होता.

यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) २०१४ मध्ये मलेशियन विमान बेपत्ता झाल्याच्या चौकशी आणि नंतर २०२० मध्ये युक्रेनियन जेटलाइनरच्या चौकशीसारख्या काही तपासात मदत करण्यासाठी तपासकर्त्यांना तैनात केले होते. 

ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे. 

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा AAIB लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

अहवाल कधी मिळेल?

रेकॉर्डर्स भारतात वाचले जातील की अमेरिकेत, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. विभाग आयसीएओच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. बहुतेक हवाई अपघात अनेक कारणांमुळे होतात आणि अपघातानंतर सुमारे ३० दिवसांनी प्राथमिक अहवाल प्राप्त होतो.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना