शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:38 IST

पायलच्या विमान अपघाताची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला तर वडील सुरेश खाटीकही धाय मोकलून रडत होते

अहमदाबाद - गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात २४१ प्रवाशी मरण पावलेत तर सुदैवाने एकमेव प्रवासी बचावला आहे. एअर इंडिया विमानाने टेकऑफ घेताच काही मिनिटांतच ही दुर्घटना झाली. या भयंकर अपघातात विमानातील प्रवाशांसोबतच ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले तिथले काही निवासी डॉक्टरही मृत्युमुखी पडलेत. या विमान अपघातात पायल खाटीक नावाच्या मुलीचाही जीव गेला आहे. 

लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं

मूळचे राजस्थानचे असलेले पायलचे कुटुंब गेल्या काही काळापासून गुजरातच्या हिंमतनगर भागात राहत होते. पायल एका खासगी कंपनीत काम करायची आणि कंपनीकडून तिला लंडनला पाठवले जात होते. पायलचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे ती खूप उत्सुक होती. मात्र तिचा हाच प्रवास अखेरचा ठरला आहे. पायलचे वडील सुरेश खाटीक हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी संघर्षात मुलीला शिकवले. मात्र तीच अचानक त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे. पायलच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबाला धक्का बसला. 

पायलच्या विमान अपघाताची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला तर वडील सुरेश खाटीकही धाय मोकलून रडत होते. जाण्यापूर्वी पायलने वडिलांशी संवाद साधला होता. पप्पा, काळजी करू नका, मी सांभाळून जाईन, पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसलीय परंतु सर्व ठीक असेल असं ती म्हणाली होती. पायल खटीक ही विमानात पहिल्यांदाच बसली होती, त्यामुळे तिला विमानतळावर सोडण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य गेले होते. पायलनेही फ्लाईटमध्ये बसल्यावर व्हिडिओ कॉल केला होता. परंतु जेव्हा विमान दुर्घटना कळली तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली. 

उड्डाण घेतल्यानंतर अचानक विमान नियंत्रणाबाहेर गेले

प्रत्यक्षदर्शीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक नियंत्रण गमावले आणि अहमदाबादच्या मेघानीनगर भागात बीजे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मेस इमारतीला धडकले. ही टक्कर इतकी भयंकर होती की विमान इमारतीला आदळताच मोठा स्फोट झाला आणि चारीबाजूने आग लागली. घटनास्थळावर काळा धूर आकाशात पसरला होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहचल्या. एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी आली. या दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना टाटा समुहाकडून १ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद