शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:38 IST

पायलच्या विमान अपघाताची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला तर वडील सुरेश खाटीकही धाय मोकलून रडत होते

अहमदाबाद - गुजरातमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात २४१ प्रवाशी मरण पावलेत तर सुदैवाने एकमेव प्रवासी बचावला आहे. एअर इंडिया विमानाने टेकऑफ घेताच काही मिनिटांतच ही दुर्घटना झाली. या भयंकर अपघातात विमानातील प्रवाशांसोबतच ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले तिथले काही निवासी डॉक्टरही मृत्युमुखी पडलेत. या विमान अपघातात पायल खाटीक नावाच्या मुलीचाही जीव गेला आहे. 

लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं

मूळचे राजस्थानचे असलेले पायलचे कुटुंब गेल्या काही काळापासून गुजरातच्या हिंमतनगर भागात राहत होते. पायल एका खासगी कंपनीत काम करायची आणि कंपनीकडून तिला लंडनला पाठवले जात होते. पायलचा हा पहिलाच विमान प्रवास होता. त्यामुळे ती खूप उत्सुक होती. मात्र तिचा हाच प्रवास अखेरचा ठरला आहे. पायलचे वडील सुरेश खाटीक हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करत त्यांनी संघर्षात मुलीला शिकवले. मात्र तीच अचानक त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे. पायलच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबाला धक्का बसला. 

पायलच्या विमान अपघाताची बातमी कळताच आईने हंबरडा फोडला तर वडील सुरेश खाटीकही धाय मोकलून रडत होते. जाण्यापूर्वी पायलने वडिलांशी संवाद साधला होता. पप्पा, काळजी करू नका, मी सांभाळून जाईन, पहिल्यांदाच फ्लाईटमध्ये बसलीय परंतु सर्व ठीक असेल असं ती म्हणाली होती. पायल खटीक ही विमानात पहिल्यांदाच बसली होती, त्यामुळे तिला विमानतळावर सोडण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य गेले होते. पायलनेही फ्लाईटमध्ये बसल्यावर व्हिडिओ कॉल केला होता. परंतु जेव्हा विमान दुर्घटना कळली तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली. 

उड्डाण घेतल्यानंतर अचानक विमान नियंत्रणाबाहेर गेले

प्रत्यक्षदर्शीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक नियंत्रण गमावले आणि अहमदाबादच्या मेघानीनगर भागात बीजे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मेस इमारतीला धडकले. ही टक्कर इतकी भयंकर होती की विमान इमारतीला आदळताच मोठा स्फोट झाला आणि चारीबाजूने आग लागली. घटनास्थळावर काळा धूर आकाशात पसरला होता. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहचल्या. एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी आली. या दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आणि अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना टाटा समुहाकडून १ कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAccidentअपघातAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबाद