शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 22:15 IST

सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती.

दिल्लीहून रांचीकडे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे (AI 9695) विमान उड्डाण होताच तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा दिल्लीला परतले. सायंकाळी ६:२० वाजता बिरसा मुंडा विमानतळावर (रांची) उतरणारे हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतच सुरक्षितपणे उतरवण्यात आले. यामुळे विमानामधील प्रवाशांमध्ये काही काळ भीती पसरली होती.

वैमानिकाला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्याने त्याने तत्काळ विमान दिल्लीला परत नेण्याचा निर्णय घेतला. दुपारी ४:२५ वाजता दिल्लीहून निघालेले हे विमान रांचीला ६:२० वाजता पोहोचणार होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते नियोजित स्थळी पोहोचू शकले नाही. तपासणी आणि तांत्रिक दुरुस्तीनंतरच विमानाने आपला पुढील प्रवास सुरू केला.

अहमदाबाद विमान अपघात आणि उच्चस्तरीय समितीची बैठकएकीकडे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही घटना समोर आली असतानाच, दुसरीकडे अहमदाबादमधील अलीकडील विमान अपघातावरून सध्या देशात वातावरण तापले आहे. या अपघाताची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी अहमदाबादमधील विमान अपघातासाठी जबाबदार असलेल्या विविध संभाव्य कारणांवर सविस्तर चर्चा केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत विविध भागधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली.

दिल्लीत झालेल्या समितीच्या या पहिल्या बैठकीचा मुख्य उद्देश विमान अपघाताच्या संभाव्य कारणांचे विश्लेषण करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानक कार्यपद्धती अर्थात एसओपी तयार करणे हा होता. या बैठकीला नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय हवाई दल, गुप्तचर विभाग, गुजरात सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो या महत्त्वाच्या विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटनाdelhiदिल्ली