शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

"एक बार कमिटमेंट कर लिया तो..."; एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:33 IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा विजय झाला. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आभारी आहोत. या विजयात प्रत्येक भारतीयाचे योगदान आहे. या ऑपरेशनला खूप प्रोफेशनली करण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा विजय झाला. यात पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. आम्ही प्रत्येक दिवशी नव्या तंत्रज्ञानाचा विकास करत आहोत. आता युद्धावेळी तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका राहील. आपल्याला भविष्यात काय करायचंय त्याबाबत ऑपरेशन सिंदूरने आयडिया दिली आहे. अजून खूप काम बाकी आहे असं सांगत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. 

वार्षिक बिझनेस समिट २०२५ च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एअर चीफ मार्शलने ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. "प्राण जाए पर वचन ना जाए..." असं सांगत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी अभिनेता सलमान खानच्या सिनेमातील फेमस डायलॉग म्हटला. एक बार जब मै खुद से कोई कमिटमेंट कर लेता हूँ, तो खुद की भी नही सुनता...या शब्दात एअर चीफ मार्शल यांनी पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा विजय झाला. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आभारी आहोत. या विजयात प्रत्येक भारतीयाचे योगदान आहे. या ऑपरेशनला खूप प्रोफेशनली करण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय युद्धाची रणनीती बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान येत आहे. युद्धात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. आपल्याला अजून काम करण्याची गरज आहे. जे आधीपासून सुरू आहे. मला विश्वास वाटतो, जसं आपण आताच्या आव्हानाला सामोरे गेलो तसे भविष्यात आपण एक राष्ट्र म्हणून आपले ध्येय गाठण्यासाठी सक्षम होऊ. जेव्हा आपण एक राष्ट्र म्हणतो, तेव्हा त्यात लष्कर, नौदल, वायूसेना, विविध यंत्रणा, उद्योग, डिआरडिओ या मोठ्या साखळ्या आहेत. त्यामुळे आपण सगळे सक्षम आहोत असं एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी सांगितले. 

भारताविरोधात दहशतवादाचं षडयंत्र, पाकला पडणार भारी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा जीव गेला होता. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. त्यात भारताने ६-७ मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सीमेजवळील शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय सैन्याने हे सगळे हल्ले परतावून लावले. पाकिस्तानकडून हल्ल्यात ड्रोन, मिसाईलचा वापर केला गेला मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान