शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत", मोहन भागवतांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:53 IST

asaduddin owaisi : अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

लखनऊ : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून राजकीय दंगल सुरू झाली आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दरम्यान माजी खासदार अतिक अहमद यांची पत्नी शाइस्ता परवीन यांनी  AIMIM मध्ये प्रवेश केला. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

ज्या नेत्यांची नावे मुझफ्फरनगर दंगलीत आली होती, त्यांच्याकडून खटला मागे घेण्यात आल्याचे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटलेही मागे घेण्यात आले. प्रज्ञा आणि कुलदीप सेंगरसारखे नेते लोकप्रिय असतील, परंतु अतीक अहमद किंवा मुख्तार अन्सारी यांना बाहुबली म्हटले जाते, असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत. पण तुम्हा सर्वांनाही ती करावे लागेल. हे लोक भारताचे संविधान स्वीकारणार नाहीत, पण डीएनए चाचणी करून घेतील. आरएसएसवाले इतिहासात कमकुवत आहेत. दरम्यान, मोहन भागवत यांनी म्हटले होते की, भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत.

याचबरोबर, असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पक्षांना 19 टक्के मुस्लिमांनी त्यांची गुलामगिरी करावी असे वाटते, पण कोणीही हिस्सेदारीबाबत बोलत नाही. अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुप्रिया पटेल यांना मंत्रीही केले. कारण जातीच्या मतांची गरज आहे. पण जेव्हा मुस्लिमांचा प्रश्न येतो, तेव्हा मुद्दा जातीय बनतो. मुस्लिमांनी राजकीय पक्षांना भरपूर मतदान केले, पण कोणीही जिंकू शकले नाही, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

काय म्हणाले होते मोहन भागवत?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित 'राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी' कार्यक्रमात संबोधित करताना ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचे काम केल्याचे म्हटले आहे. "भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले", असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. 

ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचे वातावरण निर्माण केले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केले. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असे सांगितले गेले. पण तसे झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचे स्थान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.  ब्रिटिशांना जे हवे होते ते त्यांनी त्यावेळी साध्य केले. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला आणि फोडाफोडी केली. आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशMohan Bhagwatमोहन भागवत