शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

"आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत", मोहन भागवतांच्या विधानावर ओवैसींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:53 IST

asaduddin owaisi : अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

लखनऊ : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून राजकीय दंगल सुरू झाली आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दरम्यान माजी खासदार अतिक अहमद यांची पत्नी शाइस्ता परवीन यांनी  AIMIM मध्ये प्रवेश केला. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

ज्या नेत्यांची नावे मुझफ्फरनगर दंगलीत आली होती, त्यांच्याकडून खटला मागे घेण्यात आल्याचे असदुद्दीन ओवैसी म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटलेही मागे घेण्यात आले. प्रज्ञा आणि कुलदीप सेंगरसारखे नेते लोकप्रिय असतील, परंतु अतीक अहमद किंवा मुख्तार अन्सारी यांना बाहुबली म्हटले जाते, असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आमची डीएनए चाचणी करा, आम्ही तयार आहोत. पण तुम्हा सर्वांनाही ती करावे लागेल. हे लोक भारताचे संविधान स्वीकारणार नाहीत, पण डीएनए चाचणी करून घेतील. आरएसएसवाले इतिहासात कमकुवत आहेत. दरम्यान, मोहन भागवत यांनी म्हटले होते की, भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत.

याचबरोबर, असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पक्षांना 19 टक्के मुस्लिमांनी त्यांची गुलामगिरी करावी असे वाटते, पण कोणीही हिस्सेदारीबाबत बोलत नाही. अखिलेश यांनी त्यांच्या सरकारच्या काळात योगींविरोधात खटला चालवला असता तर योगी काही करू शकले नसते. कारण त्या सर्वांना मुस्लिमांनी पुढे जावे असे वाटत नाही, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुप्रिया पटेल यांना मंत्रीही केले. कारण जातीच्या मतांची गरज आहे. पण जेव्हा मुस्लिमांचा प्रश्न येतो, तेव्हा मुद्दा जातीय बनतो. मुस्लिमांनी राजकीय पक्षांना भरपूर मतदान केले, पण कोणीही जिंकू शकले नाही, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

काय म्हणाले होते मोहन भागवत?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित 'राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी' कार्यक्रमात संबोधित करताना ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचे काम केल्याचे म्हटले आहे. "भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले", असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे. 

ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचे वातावरण निर्माण केले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केले. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असे सांगितले गेले. पण तसे झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचे स्थान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.  ब्रिटिशांना जे हवे होते ते त्यांनी त्यावेळी साध्य केले. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला आणि फोडाफोडी केली. आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशMohan Bhagwatमोहन भागवत