शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

"मोदी चीनवर बोलण्यास घाबरतात, एवढं की चहामध्येही साखर टाकत नाहीत"'; ओवैसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:09 IST

Asaduddin Owaisi And Narendra Modi : असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला आहे. सीमेवर चीनची घुसखोरी आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत मोदींवर निशाणा साधला आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदीचीनवर बोलण्यास नेहमीच घाबरतात. एवढं की चहामध्ये साखर देखील टाकत नाहीत जेणेकरून चीनचा उल्लेख होऊ येऊ नये. काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून ओवैसींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. 

असदुद्दीन ओवैसी यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून देखील मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. "मोदी दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाहीत. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची वाढते दर आणि दुसरी म्हणजे चीनची घुसखोरी. चीन आपल्या देशात घुसून बसला आहे पण ते काहीच करत नाहीत" असं देखील ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी टी-20 विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे 9 सैनिक शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकार 24 ऑक्टोबर रोजी क्रिकेट सामना खेळत आहे,'अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.

'आपले सैनिक सीमेवर शहीद होत आहेत आणि तुम्ही भारत-पाक T-20 खेळवणार?'

यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हणाले की, 'नरेंद्र मोदी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणाले होते, सैनिक मरत आहे आणि मनमोहन सिंग सरकार बिर्याणी खाऊ घालत आहे. आणि आता 9 सैनिक शहीद होतात आणि तुम्ही टी-20 खेळवणार? काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतीयांच्या जीवाशी खेळत आहे,'असंही ओवैसी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील हत्यांवर ओवैसी म्हणाले- 'काश्मीरमध्ये टार्गेट किलींग होत आहे. भारताच्या सीमा बंद केल्या तरी ड्रोनमधून शस्त्रे येत आहेत. इंटेलिजंस काय करत आहे? अमित शहा काय करत आहेत? 370 काढून टाकल्यानंतर काश्मीरमध्ये सर्व शांत होईल, असं वाटलं होतं. पण, असं काहीच झालं नाही. सीमेपलीकडून दहशतवादी येत आहेत.

केंद्र सरकारची पाक सीमेवरील नियंत्रण रेषेसाठी काही योजना आहे का?

ओवेसी पुढे म्हणाले, 'जम्मू-काश्मीरमध्ये दररोज हत्या होत आहेत. आमचे सैनिक मारले जात आहेत. मग पाकिस्तानने NSA बरोबर चर्चा करण्याचा काय अर्थ आहे? जर तुम्ही खोऱ्यातील हत्या थांबवल्या नाहीत तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्याची पुनरावृत्ती होईल. आता तुम्ही NSA बरोबर काय चर्चा कराल? भाजपकडे स्थिर परराष्ट्र धोरण नाही. अशा वातावरणात तुम्ही त्याच्याशी बोललात तर काय होईल? केंद्र सरकारची पाक सीमेवरील नियंत्रण रेषेसाठी काही योजना आहे का?, असे अनेक प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनFuel Hikeइंधन दरवाढ