शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर ओवेसी, दिग्विजय सिंहांचा निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:48 IST

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले होते, की सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो. एवढेच नाही, तर लिंचिंगसंदर्भात बोलताना ते म्हणाले होते, यात सहभागी असलेले लोक हिंदुत्वाविरोधात आहेत आणि लोकशाहीत हिंदूंचे अथवा मुस्लिमांचे प्रभूत्व राहू शकत नाही. (AIMIM Asaduddin owaisi tweet on mohan bhagwat's statement cowardice violence and killing are part of godse's hindutva thinking)

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी,  अशी शिकवण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का? असा सवाल केला आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''आरएसएस प्रमुख भागवत म्हणतात, की लिंचिंग करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. यांना गाय आणि म्हैस यांच्याचील फरक माहीत नसेल. मात्र, मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलीमुद्दीन नावेच पुष्कळ होती. हा द्वेश हिंदुत्वाची देण आहे. या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारचे रक्षण आहे.''

भाजपवरही निशाणा - ओवेसींनी म्हटले, अखलाकला मारणाऱ्यांच्या मृतदेहावर तिंरंगा लावला जातो. आसिफला मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते. येथे भाजपचा प्रवक्ता विचारतो, की आम्ही हत्याही करू शकत नाही? ते म्हणाले हा भ्याडपणा, हिंसा आणि खून करणे गोडसेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे अभिन्न अंग आहे. मुस्लिमांचे लिंचिंगदेखील याच विचारांचा परिणाम आहे.

 काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही भागवतांच्या वक्तव्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''मोहन भागवत हा विचार आपले शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही देणार का? हीच शिकवण आपण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का?"

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत -एनसीपी नेते नवाब मलिक यांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ''मोहन भागवतांचे वक्तव्य, की भारतात राहणाऱ्या सर्वांचा डिएनए एकच आहे. जर भागवतांचे हृदय परिवर्तन होत असेल तर आम्ही त्याचे स्वाग तरतो. वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे संघटन जर धर्माच्या सीमा तोडू इच्छित असेल, तर ही चांगली गोष्ट आहे.''

नेमकं काय म्हणाले होते मोहन भागवत?- ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा ‘संवाद’ आहे, विसंवाद नव्हे. - सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग त्यांचा धर्म कोणताही असो. हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा दिशाभूल करणारी आहे. कारण ते वेगळे नसून एकच आहेत. - आपण लोकशाही देशात आहोत. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. येथे केवळ भारतीयांचे वर्चस्व असू शकते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीDigvijaya Singhदिग्विजय सिंहMohan Bhagwatमोहन भागवतnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस