शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर ओवेसी, दिग्विजय सिंहांचा निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:48 IST

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले होते, की सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो. एवढेच नाही, तर लिंचिंगसंदर्भात बोलताना ते म्हणाले होते, यात सहभागी असलेले लोक हिंदुत्वाविरोधात आहेत आणि लोकशाहीत हिंदूंचे अथवा मुस्लिमांचे प्रभूत्व राहू शकत नाही. (AIMIM Asaduddin owaisi tweet on mohan bhagwat's statement cowardice violence and killing are part of godse's hindutva thinking)

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी,  अशी शिकवण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का? असा सवाल केला आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''आरएसएस प्रमुख भागवत म्हणतात, की लिंचिंग करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. यांना गाय आणि म्हैस यांच्याचील फरक माहीत नसेल. मात्र, मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलीमुद्दीन नावेच पुष्कळ होती. हा द्वेश हिंदुत्वाची देण आहे. या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारचे रक्षण आहे.''

भाजपवरही निशाणा - ओवेसींनी म्हटले, अखलाकला मारणाऱ्यांच्या मृतदेहावर तिंरंगा लावला जातो. आसिफला मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते. येथे भाजपचा प्रवक्ता विचारतो, की आम्ही हत्याही करू शकत नाही? ते म्हणाले हा भ्याडपणा, हिंसा आणि खून करणे गोडसेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे अभिन्न अंग आहे. मुस्लिमांचे लिंचिंगदेखील याच विचारांचा परिणाम आहे.

 काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही भागवतांच्या वक्तव्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''मोहन भागवत हा विचार आपले शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही देणार का? हीच शिकवण आपण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का?"

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत -एनसीपी नेते नवाब मलिक यांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ''मोहन भागवतांचे वक्तव्य, की भारतात राहणाऱ्या सर्वांचा डिएनए एकच आहे. जर भागवतांचे हृदय परिवर्तन होत असेल तर आम्ही त्याचे स्वाग तरतो. वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे संघटन जर धर्माच्या सीमा तोडू इच्छित असेल, तर ही चांगली गोष्ट आहे.''

नेमकं काय म्हणाले होते मोहन भागवत?- ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा ‘संवाद’ आहे, विसंवाद नव्हे. - सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग त्यांचा धर्म कोणताही असो. हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा दिशाभूल करणारी आहे. कारण ते वेगळे नसून एकच आहेत. - आपण लोकशाही देशात आहोत. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. येथे केवळ भारतीयांचे वर्चस्व असू शकते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीDigvijaya Singhदिग्विजय सिंहMohan Bhagwatमोहन भागवतnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस