शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर ओवेसी, दिग्विजय सिंहांचा निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 14:48 IST

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले होते, की सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो. एवढेच नाही, तर लिंचिंगसंदर्भात बोलताना ते म्हणाले होते, यात सहभागी असलेले लोक हिंदुत्वाविरोधात आहेत आणि लोकशाहीत हिंदूंचे अथवा मुस्लिमांचे प्रभूत्व राहू शकत नाही. (AIMIM Asaduddin owaisi tweet on mohan bhagwat's statement cowardice violence and killing are part of godse's hindutva thinking)

भागवतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंसा आणि खून करणे हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा भाग आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी,  अशी शिकवण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का? असा सवाल केला आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''आरएसएस प्रमुख भागवत म्हणतात, की लिंचिंग करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. यांना गाय आणि म्हैस यांच्याचील फरक माहीत नसेल. मात्र, मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलीमुद्दीन नावेच पुष्कळ होती. हा द्वेश हिंदुत्वाची देण आहे. या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारचे रक्षण आहे.''

भाजपवरही निशाणा - ओवेसींनी म्हटले, अखलाकला मारणाऱ्यांच्या मृतदेहावर तिंरंगा लावला जातो. आसिफला मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते. येथे भाजपचा प्रवक्ता विचारतो, की आम्ही हत्याही करू शकत नाही? ते म्हणाले हा भ्याडपणा, हिंसा आणि खून करणे गोडसेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे अभिन्न अंग आहे. मुस्लिमांचे लिंचिंगदेखील याच विचारांचा परिणाम आहे.

 काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही भागवतांच्या वक्तव्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ''मोहन भागवत हा विचार आपले शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही देणार का? हीच शिकवण आपण मोदी-शाह आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही देणार का?"

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत -एनसीपी नेते नवाब मलिक यांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ''मोहन भागवतांचे वक्तव्य, की भारतात राहणाऱ्या सर्वांचा डिएनए एकच आहे. जर भागवतांचे हृदय परिवर्तन होत असेल तर आम्ही त्याचे स्वाग तरतो. वर्ण व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे संघटन जर धर्माच्या सीमा तोडू इच्छित असेल, तर ही चांगली गोष्ट आहे.''

नेमकं काय म्हणाले होते मोहन भागवत?- ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. एकतेचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा ‘संवाद’ आहे, विसंवाद नव्हे. - सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे. मग त्यांचा धर्म कोणताही असो. हिंदू-मुस्लिम एकतेची चर्चा दिशाभूल करणारी आहे. कारण ते वेगळे नसून एकच आहेत. - आपण लोकशाही देशात आहोत. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. येथे केवळ भारतीयांचे वर्चस्व असू शकते.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीDigvijaya Singhदिग्विजय सिंहMohan Bhagwatमोहन भागवतnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस