शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Owaisi On Rahul Gandhi: 'देशात पुन्हा एकदा हिंदूंचं राज्य आणायचंय', राहुल गांधींच्या वक्तव्यावर ओवेसी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 19:25 IST

देशात २०१४ पासून हिंदूंचे राज्य आहे, आपल्याला पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी थेट प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (रविवार) जयपूर येथे मोठी घोषणा केली. देशात २०१४ पासून हिंदूंचे राज्य आहे, आपल्याला पुन्हा एकदा हिंदूंचे राज्य आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी थेट प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. तुम्हीच हिंदुत्वासाठी मैदान तयार केले, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. (Asaduddin Owaisi on Rahul Gandhi)

राहुल गांधी यांच्या घोषणेवर ट्विट करत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "राहुल आणि काँग्रेसनेच हिंदुत्वासाठी जमीन तयार केली आहे. आता ते बहुसंख्यवादाचे पीक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदूंना सत्तेत आणणे हा 2021 साठीचा एक 'धर्मनिरपेक्ष' अजेंडा झाला आहे. वा! भारत सर्व भारतीयांचा आहे. एकट्या हिंदूंचा नाही. भारत सर्व धर्मांच्या लोकांचा आहे आणि जे धर्मावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांचाही आहे. "

राहुल गांधी यांनी आज जयपूर येथे 'महागाई हटाओ रॅली'ला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, "हा देश हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. देशात महागाई असेल, त्रास असेल, तर हे काम हिंदुत्ववाद्यांनी केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे." हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही भिन्न असल्याचे सांगत राहुल म्हणाले, ज्याप्रमाणे दोन जीवांचा एक आत्मा असू शकत नाही, त्याचप्रमाणे दोन शब्दांचा एकच अर्थ असू शकत नाही, कारण प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ होत असतो.

'मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही...' - राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. हे सर्व हिंदू आहेत पण हिंदुत्ववादी नाहीत. आज मला तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक सांगायचा आहे. महात्मा गांधी हिंदू, गोडसे हिंदुत्ववादी. काहीही झाले तरी हिंदू सत्याचा शोध घेतो. गर पडली तर तो त्यासाठी जीवाचीही परवा करत नाही, तो सत्याचा शोध घेतो. त्याचा मार्ग सत्याग्रहाचा आहे. तो संपूर्ण जीवन सत्याच्या शोधात घालवतो. महात्मा गांधींनी माय एक्सपिरियन्स विथ ट्रुथ हे आत्मचरित्र लिहिले, म्हणजे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्याच्या प्रयत्नात घालवले आणि शेवटी एका हिंदुत्ववाद्याने त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या, असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीम