शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:11 IST

Ahmedabad plane crash Update: विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक अहमदाबादमधील अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, एएआयबीने हा दावा फेटाळून लावला आहे.

गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कसा झाला. त्यासाठी कोणती चूक कारणीभूत ठरली याचा तपास सुरू असून, त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक या अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, या विमान अपघाताचा तपास करत असलेल्या भारतीय विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून काही दुजोरा न मिळालेल्या अहवालांच्या माध्यमातून काढण्यात येत असलेल्या निष्कर्षांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्राथमिक तपासाचा उद्देश केवळ अपघातावेळी काय घडलं हे सांगण्याचा आहे. त्याआधारावर कुठला निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण तपास असून पूर्ण झालेला नाही, असे या संस्थेने स्पष्ट केले आहे.

एएआयबीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील काही निवडक वर्ग निवडक आणि कुठलाही आधार नसलेल्या अहवालांच्या आधारावर अपघाताबाबत निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत आहे. तपास सुरू असताना असे दावे करणे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे.

अशा प्रकारे बेजबाबदार वार्तांकन केल्यामुळे केवळ तपास प्रक्रियाच धोक्यात येत नाही तर त्यामुळे दुर्घटनेत जीव गमावणारे प्रवासी, कर्मचारी आणि इतर व्यक्तींच्या भानवाही दुखावल्या जातात. प्राथमिक अहवालाचा उद्देश हा केवळ त्यावेळी काय घडलं हे सांगण्याचा आहे. त्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही एएआयबीने स्पष्ट केले.   

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया