शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:11 IST

Ahmedabad plane crash Update: विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक अहमदाबादमधील अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, एएआयबीने हा दावा फेटाळून लावला आहे.

गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कसा झाला. त्यासाठी कोणती चूक कारणीभूत ठरली याचा तपास सुरू असून, त्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या विमानाच्या वैमानिकांकडून झालेली चूक या अपघातास कारणीभूत ठरली असावी, असा दावा काही वृत्तांमधून एका अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. दरम्यान, या विमान अपघाताचा तपास करत असलेल्या भारतीय विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून काही दुजोरा न मिळालेल्या अहवालांच्या माध्यमातून काढण्यात येत असलेल्या निष्कर्षांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्राथमिक तपासाचा उद्देश केवळ अपघातावेळी काय घडलं हे सांगण्याचा आहे. त्याआधारावर कुठला निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण तपास असून पूर्ण झालेला नाही, असे या संस्थेने स्पष्ट केले आहे.

एएआयबीने सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधील काही निवडक वर्ग निवडक आणि कुठलाही आधार नसलेल्या अहवालांच्या आधारावर अपघाताबाबत निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत आहे. तपास सुरू असताना असे दावे करणे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे.

अशा प्रकारे बेजबाबदार वार्तांकन केल्यामुळे केवळ तपास प्रक्रियाच धोक्यात येत नाही तर त्यामुळे दुर्घटनेत जीव गमावणारे प्रवासी, कर्मचारी आणि इतर व्यक्तींच्या भानवाही दुखावल्या जातात. प्राथमिक अहवालाचा उद्देश हा केवळ त्यावेळी काय घडलं हे सांगण्याचा आहे. त्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही एएआयबीने स्पष्ट केले.   

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया