शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:48 IST

Ahmedabad plane crash: एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रिमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमानं सेवेत आहेत.

गेल्या महिन्यात १२ जून रोजी अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर आपला जबाब सादर केले. या जबाबामध्ये एअर इंडियाने या अपघातातील विमान बोईंग-७८७-८ च्या दर्जाचा बचाव केला. तसेच हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक असल्याचे सांगितले.

एअर इंडियाने संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सांगितले की, ड्रिमलायनर हे जगातील सर्वात सुरक्षित विमानांपैकी एक आहे. तसेच सद्यस्थितीत जगभरात १ हजारांहून अधिक ड्रीमलायनर विमानं सेवेत आहेत. खरंतर विमानतळांवर अभिभार लावण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर ही बैठक कमालीची तणावपूर्ण झाली.

१२ जून रोजी अहमदाबादमधील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान एआय-१७१ हे जवळच असलेल्या मेघानीनगरमधील बीजे  वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळलं होतं. त्यात प्रवासी, विमानातील कर्मचारी, महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टर आणि इतर अशा मिळून सुमारे २७५ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघातामुळे कंपनी खूप चिंतीत असून, याबाबतच्या अधिकृत अहवालाची वाट पाहिली जात आहे असे एअर इंडियाकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादAccidentअपघातParliamentसंसद