शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:13 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash :अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

अहमदाबाद - अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात घडली. यात शिकाऊ डॉक्टरांसह २४ जण देखील मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. अनेक इमारती, वाहनांना आग लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सांगितले, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानातील वैमानिकाने ‘मेडे’ असा संदेश पाठविला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर किंवा काही संकटात सापडले असेल तर हा संदेश दिला जातो. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे एका स्थानिक नागरिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसून येते. या विमानातील २४२ जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. 

विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान - हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्सजवळ कोसळले. या दुर्घटनेत किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी मृत्युमुखी पडली असून, ६० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे.   -दुपारचे जेवण सुरू असल्याने विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर हॉस्टेलमध्येच होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेली आग इतकी मोठी होती की, त्यामुळे एका पाच मजली इमारतही खाक झाली.  - भारतातील २०२० नंतरची ही दुसरी सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे. पूर्वी कोझिकोड (केरळ) येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान ओल्या धावपट्टीवरून घसरून दोन तुकडे झाले होते. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ ऑक्टोबर १९८८ रोजी इंडियन एअर लाइन्सचे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरतानाच कोसळले होते. त्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता. 

ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करणारअहमदाबाद : गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात येणार आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने त्यांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे, असे आरोग्य खात्याचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले.  

विमानात कोणत्या देशाचे  किती नागरिक?अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या विमानात १२ क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एक नागरिक यांचा समावेश होता. हे विमान गुरुवारी सायंकाळी ६.२५ वाजता लंडनमध्ये लँड करणे अपेक्षित होते.   

मृतांच्या वारसांना टाटा समूह देणार १ कोटी रुपयेनवी दिल्ली : अहमदाबादेतील एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या परिवारास १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा टाटा समूहाने गुरुवारी केली. टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी  ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, प्रत्येक मृताच्या वारसास टाटा समूह १ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देईल. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च समूह करेल. बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य केले जाईल.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात