शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:13 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash :अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

अहमदाबाद - अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी  केवळ एकच प्रवासी बचावला आहे.

मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात घडली. यात शिकाऊ डॉक्टरांसह २४ जण देखील मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. अनेक इमारती, वाहनांना आग लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सांगितले, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानातील वैमानिकाने ‘मेडे’ असा संदेश पाठविला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर किंवा काही संकटात सापडले असेल तर हा संदेश दिला जातो. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे एका स्थानिक नागरिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसून येते. या विमानातील २४२ जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. 

विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान - हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्सजवळ कोसळले. या दुर्घटनेत किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी मृत्युमुखी पडली असून, ६० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे.   -दुपारचे जेवण सुरू असल्याने विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर हॉस्टेलमध्येच होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेली आग इतकी मोठी होती की, त्यामुळे एका पाच मजली इमारतही खाक झाली.  - भारतातील २०२० नंतरची ही दुसरी सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे. पूर्वी कोझिकोड (केरळ) येथे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान ओल्या धावपट्टीवरून घसरून दोन तुकडे झाले होते. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ ऑक्टोबर १९८८ रोजी इंडियन एअर लाइन्सचे विमान अहमदाबाद विमानतळावर उतरतानाच कोसळले होते. त्यात १३० जणांचा मृत्यू झाला होता. 

ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करणारअहमदाबाद : गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या करण्यात येणार आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलने त्यांचे डीएनए नमुने गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे, असे आरोग्य खात्याचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी यांनी सांगितले.  

विमानात कोणत्या देशाचे  किती नागरिक?अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय-१७१ या विमानात १२ क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एक नागरिक यांचा समावेश होता. हे विमान गुरुवारी सायंकाळी ६.२५ वाजता लंडनमध्ये लँड करणे अपेक्षित होते.   

मृतांच्या वारसांना टाटा समूह देणार १ कोटी रुपयेनवी दिल्ली : अहमदाबादेतील एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या परिवारास १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा टाटा समूहाने गुरुवारी केली. टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी  ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, प्रत्येक मृताच्या वारसास टाटा समूह १ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देईल. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च समूह करेल. बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य केले जाईल.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात