शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाटणा येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी विरोधी पक्षांमध्ये मतभेद उफाळले, उपस्थित झाले हे प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 19:10 IST

Opposition Parties Unity: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभं करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र विरोधी ऐक्याच्या बाता मारणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरून मतभेद उफाळून आले आहेत.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभं करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र विरोधी ऐक्याच्या बाता मारणाऱ्या विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्यांवरून मतभेद उफाळून आले आहेत. एकीकडे अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारच्या अध्यादेशाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट व्हावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर प्रादेशिक पक्षांना मतांमध्ये फूट पाडण्यापासून वाचण्याचा सल्ला देत आहे. एवढंच नाही तर काँग्रेस पक्ष मतांमध्ये फूट पाडून भाजपाला फायदा पोहोचवण्याऱ्या पक्षांची यादी तयार करत आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी ठरवण्यासाठी अनेक विरोधी पक्षांची २३ जून रोजी पाटणा येथे बैठक होणार आहे. या बैठकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचा सामना करण्यासाठीची ब्ल्यू प्रिंट समोर येऊ शकते. मात्र दिल्लीच्या राजकारणात येऊन दहा वर्षे झाली तरी मोदींच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. त्यामुळे मोदींना आव्हान देण्याचा विरोधी पक्षांचा मार्ग तितकासा सोपा नसेल. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पंतप्रधान मोदींचं सर्वात मोठं बलस्थान आणि विरोधी पक्षांचा सर्वात कमकुवत दुवा म्हणजे प्रादेशिक पक्ष भाजपाला पराभूत करण्यात यशस्वी ठरत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा फॉर्म्युला विरोधी पक्षांना सापडलेला नाही. हे २०१९ पूर्वीही घडले होते. तसेच आताही तशीच परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, राहुल गांधी, शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेते पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. मात्र मोदींच्या लोकप्रियतेचा सामना करणं त्यांना शक्य झालेलं नाही.

दुसरी बाब म्हणजे आप विरुद्ध काँग्रेस अशा होत असलेल्या लढाईचा आहे. आपने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. गुजरात आणि गोव्यामध्ये आपने मतं फोडल्यामुळे भाजपाचा फायदा झाला, असा काँग्रेसचा आरोप आहे. तसेच त्याची पुनरावृत्ती मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये होईल, असा दावाही काँग्रेसकडून केला जात आहे. मात्रा आम्ही मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणूक लढू नये असं वाटत असेल तर काँग्रेसने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवू नये, अशी मागणी आपकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल