शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:29 IST

Agriculture Budget 2020 : शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे.

ठळक मुद्देवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2020-21 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर  केलाशेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीरया 16 कलमी योजनेसाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद

नवी दिली  - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2020-21 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर  केला. यावेळी शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोईसवलती पुरवण्याची घोषमा वित्तमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांसाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मोठ्या घोषणा - केंद्राच्या मॉडेल लॉला लागू करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहित करण्यात येईल - पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या 100 जिल्ह्यात व्यापक प्रयत्न केले जातील - पंतप्रधान कुसूम योजनेंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येईल- 15 लाख शेतकऱ्यांना ग्रीड कनेक्टेड पंपसेटशी जोडून घेतले जाईल 

- उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल, रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल, रासायनिक खतांच्या संतुलित वापरासाठी माहिती दिली जाईल -  देशात 162 दशलक्ष टन धान्य साठवण क्षमता आहे. आता नाबार्ड याला जीयोटॅग करेल. तसेच धान्य साठवणीसाठी गट आणि तालुका स्तरावर नवी कोठारे बांधली जातील. त्यासाठी राज्य सरकार जमीन देऊ शकते. -  महिलांसाठी धान्य लक्ष्मी योजनेची घोषणा, त्याअंतर्गत बीबियाण्याशी संबंधित योजनांमध्ये महिलांना सामावून घेतले जाईल, स्वयंसहायता गटांद्वारे गावाता साठवण भांडारे उभारली जातील - दूध, मांस, मासे यांची साठवण आणि वाहतूक करण्यासाठी विशेष किसान रेल्वे धावणार- शेतकऱ्यांसाठी कृषी उडाण योजना सुरू केली जाईल, ही विमानसेवा कृषिमंत्रालयाकडून दिली जाईल 

- दूध उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकारकडून योजना चालवली जाईल, 2025 पर्यंत दुग्धउत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य -  311 दशलक्ष टन उत्पादनासह बागायती उत्पादनात देश बराच पुढे गेला आहे. आता एक उत्पादन, एक जिल्हा योजनेस प्रोत्साहन देण्यात येईल

- एकीकृत कृषी मधुमाशी पालनास प्रोत्साहन देण्यात येईल - नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, जैविक शेतीसाठी एक पोर्टल तयार केले जाईल, ऑनलाइन मार्केट मजबूत बनवले जाईल- फायनान्सिंग ऑन निगोशिएबल वेअर हाऊसिंग स्कीम अधिक मजबूत केली जाईल 

- किसान क्रेडिट कार्ड योजनेस 2021 पर्यंत मुदतवाढ- देशातील शेतकऱ्यांना सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असून, त्यासाठी नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाईल - फूड अँड माऊख आजार तसेच पीपीआर आजारांचे 2025 पर्यंत उच्चाटन केले जाईल - सागरी क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना,  पुढील आर्थिक वर्षांत मत्स्य उत्पादन 308 दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य,  3077 सागर मित्र तयार केले जातील त्यातून किनारी भागातील तरुणांना रोजगार मिळेल - दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत 58 लाख एसएचजी बनवण्यात आले आहे. त्यांना अधिक भक्कम केले जाईल. 

टॅग्स :budget 2020बजेटbudget did you knowबजेट माहितीbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन