शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Farm Laws : कृषी कायद्यांना शरद पवारांचं समर्थन? नरेंद्र सिंह तोमर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 17:21 IST

शरद पवार गुरुवारी म्हणाले होते, शेतकरी 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात डेडलॉक झाले आहे आणि ते अजूनही तेथेच बसून आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते तथा NCP अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कृषी कायद्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. तोमर म्हणाले, "शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर बोलताना म्हटले आहे, की सर्वच कायदे बदलण्याची आवश्यकता नाही. ज्या मुद्द्यांवर आक्षेप असेल, त्यावर विचार करून ते बदलायला हवेत." कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्यारून, शरद पवार कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर सरकारला सहकार्य करत आहेत, असे दिसते. (Agri Minister Narendra Singh Tomar welcomes the stand of NCP chief Sharad Pawar on the farm laws) 

शरद पवार गुरुवारी म्हणाले होते, शेतकरी 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. पण, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात डेडलॉक झाले आहे आणि ते अजूनही तेथेच बसून आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला हवी." शरद पवार यांच्या या वक्तव्यावर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हणटले आहे, की आपण शरद पवारांच्या या भूमिकेचे स्वागत करतो आणि सरकारही कुठल्याही मुद्यावर चर्चेतून मार्ग निघायला हवा, यावर सहमत आहे, असे म्हटले आहे.

शरद पवारही UPA सरकारमध्ये कृषी मंत्री होते आणि सध्याच्या मोदी सरकारने जे कायदे आणले आहेत, अगदी तसेच कायदे आणण्याची त्यावेळच्या यूपीए सरकारचीही इच्छा होती. त्यावेळी काँग्रेसकडूनही अगदी याच पद्धतीचे कायदे तयार करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. पण, गेल्या वर्षी मोदी सरकारने हे नवे कृषी कायदे आणल्यानंतर, मात्र विरोधकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे.

सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे - शरद पवारपंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. आता चर्चा करायलाही तयार नाहीत. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी तेथे गोंधळ घातल्याचे ऐकले. सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmer strikeशेतकरी संप