शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:51 IST

Agniveer Controversy: राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री एक व्हिडीओ शेअर करत शहीद अग्निवीराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच या अग्निवीराच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. मात्र लष्कर आणि  संबंधित अग्निवीराच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपाचं बहुमत हुकल्याने आणि विरोधी पक्षातील काँग्रेससह इंडिया आघाडीच्या संख्याबळात लक्षणीय वाढ झाल्याने विरोधी पक्षांमधील नेते सध्या कमालीचे आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यातही विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी नव्या लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात केलेल्या भाषणामधून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवरून राहुल गांधी यांनी अनेक आरोप केले होते. मात्र हे आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री एक व्हिडीओ शेअर करत शहीद अग्निवीराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच या अग्निवीराच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. मात्र लष्कर आणि  संबंधित अग्निवीराच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये अग्निवीर जवानांचा मुद्दा उपस्थित करताना लुधियाना येथील अजय कुमार याचा उल्लेख केला होता. अजय कुमार याचा जानेवारी महिन्यात जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे भूसुरुंगाच्या स्फोटात मृत्यू झाला होता. दरम्यान, लोकसभेत केलेल्या आपल्या दाव्याला खरं ठरवण्यासाठी बुधवारी रात्री या शहीद जवानाचा उल्लेख करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत आता लष्कराकडून स्पष्टिकरण देण्यात आलं आहे. तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहीद अजय कुमारच्या वडिलांनीही याबाबत माहिती दिली आहे. शहीद अग्निवीर अजय कुमार याचे वडील चरणजीत सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या खात्यात ९८ लाख रुपये जमा झाले आहेत. अजय कुमार याच्या मृत्यूनंतर ५० लाख रुपये मिळाले होते. तर १० जून रोजी ४८ लाख रुपये मिळाले, अशी माहिती त्यांनी झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानंतर लष्कराकडूनही अजय कुमार याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. लष्कराने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की, एकूण रकमेपैकी ९८.३९ लाख रुपये अग्निवीर अजय याच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहेत. अग्निवीर योजनेतील तरतुदींनुसार ६७ लाख रुपयांची मदत आणि इतर लाभ हे पोलीस व्हेरिफिकेशननंतर दिले जातील. त्यामुळे मदतीची एकूण रक्कम ही एक लाख ६५ कोटी एवढी होईल.

दरम्यान, राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेले अग्निपथ भरती योजनेसंदर्भातील दावे फेटाळून लावताना अग्निवीर योजना ही १५८ संघटनांकडून सल्ले घेतल्यानंतर सुरू करण्यात आल्याचे सांगितले. लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी अजय कुमार याच्या वडिलांच्या घेतलेल्या भेटीचा उल्लेख करत केंद्र सरकार त्याला शहिदाचा दर्जा दिला नाही. तसेच त्याच्या कुटुंबाला योग्य मोबदलाही दिला नाही, तसेच त्याच्या कुटुंबासाठी पेन्शनचीही कुठली व्यवस्था केलेली नाही, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी हे चुकीची विधानं करत सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार