शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांना 'दौलतवीर' तर तरुणांना 'अग्निवीर' बनवत आहेत", राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:01 IST

Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशात सत्याग्रह केला.

Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात सत्याग्रह केला. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. 

संबंधित बातमी- निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी

'विमानतळ देऊन मित्रांना श्रीमंत बनवले'केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, "पंतप्रधान आपल्या मित्रांना 50 वर्षांसाठी देशातील विमानतळे देऊन 'दौलतवीर' बनवत आहेत आणि तरुणांना केवळ 4 वर्षांच्या करारावर 'अग्नीवीर' बनवले जात आहे. आज अग्निपथविरोधात काँग्रेस देशभरात सत्याग्रह करत आहे. जोपर्यंत तरुणांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह थांबणार नाही,' असे ट्विट राहुल यांनी केले.

यूपीत काँग्रेसचा सत्याग्रहकेंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते सत्याग्रह करत आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते विकास श्रीवास्तव यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अन्यायकारक तुघलकी अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश काँग्रेस जोरदार विरोध करत आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा-शहर अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शांततेत सत्याग्रह करण्यात आला. 

'ही दोन व्यक्तींमधील नाही तर दोन भिन्न विचारधारांची लढाई', राहुल गांधींचे टीकास्त्र

'...तर तरुणांचे लग्नही होणार नाही'मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी 'अग्निपथ' योजनेला विरोध करत सरकारने या योजनेचा पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे. मलिक म्हणाले की, जवान सहा महिने प्रशिक्षण घेतील, सहा महिन्यांची रजा आणि तीन वर्षांच्या सेवेनंतर घरी परतल्यावर त्याचे लग्नही होणार नाही. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी