शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

"नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रांना 'दौलतवीर' तर तरुणांना 'अग्निवीर' बनवत आहेत", राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:01 IST

Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशात सत्याग्रह केला.

Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात सत्याग्रह केला. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. 

संबंधित बातमी- निवृत्तीनंतर अग्निवीरांना रेल्वेत रोजगाराची संधी; रेल्वे मंत्र्यांकडून लवकरच मिळेल मंजुरी

'विमानतळ देऊन मित्रांना श्रीमंत बनवले'केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, "पंतप्रधान आपल्या मित्रांना 50 वर्षांसाठी देशातील विमानतळे देऊन 'दौलतवीर' बनवत आहेत आणि तरुणांना केवळ 4 वर्षांच्या करारावर 'अग्नीवीर' बनवले जात आहे. आज अग्निपथविरोधात काँग्रेस देशभरात सत्याग्रह करत आहे. जोपर्यंत तरुणांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह थांबणार नाही,' असे ट्विट राहुल यांनी केले.

यूपीत काँग्रेसचा सत्याग्रहकेंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ सोमवारी उत्तर प्रदेशातील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते सत्याग्रह करत आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते विकास श्रीवास्तव यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अन्यायकारक तुघलकी अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश काँग्रेस जोरदार विरोध करत आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी प्रियांका गांधी यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा-शहर अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शांततेत सत्याग्रह करण्यात आला. 

'ही दोन व्यक्तींमधील नाही तर दोन भिन्न विचारधारांची लढाई', राहुल गांधींचे टीकास्त्र

'...तर तरुणांचे लग्नही होणार नाही'मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी 'अग्निपथ' योजनेला विरोध करत सरकारने या योजनेचा पुनर्विचार करावा, असे म्हटले आहे. मलिक म्हणाले की, जवान सहा महिने प्रशिक्षण घेतील, सहा महिन्यांची रजा आणि तीन वर्षांच्या सेवेनंतर घरी परतल्यावर त्याचे लग्नही होणार नाही. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी