शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन चिघळले, दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी अमित शाहांचा प्रस्ताव फेटाळला

By बाळकृष्ण परब | Updated: November 29, 2020 15:15 IST

Farmer News : नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्देदिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहेआता शेतकरी नेते आज संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. आता शेतकरी नेते आज संध्याकाळी चार वाजता सिंधू बॉर्डरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असून, या पत्रकार परिषदेत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.शेतकरी नेत्यांच्या बैठकीस उपस्थित असलेले स्वराज पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले की, आज सकाळी पंजाबच्या ३० शेतकरी संघटनांची बैठक झाली. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काल रात्री गृहसचिवांनी पाठवलेल्या पत्रात कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी रस्ते रिकामी करून बुराडी येथे येण्याची अट घालण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ही अट फेटाळून लावली आहे. आमचा हेतू रस्ता अडवून जनतेला त्रस्त करण्याचा नाही आहे. शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अशा परिस्थिती सरकारने अटी घालून प्रस्ताव पाठवणे योग्य नाही.

यादव यांनी सांगितले की, या मुद्यावर बुराडी येथे आज संध्याकाळी चार वाजता शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी सांगितले की, २६ तारखेला दिल्ली चलोची जी हाक देण्यात आली होती ती संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आली होती. संयुक्त किसान मोर्चामध्ये देशभरातील ४५० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना ७ सदस्यांची एक समिती बनवण्यात आली होती. त्या सात सदस्यांपैकी मी एक आहे.सध्या शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीला इतर राज्यांना जोडणाऱ्या सीमांवर जमले आहेत. पंजाबमधून आलेले शेतकरी दिल्लीतील सिंघू आणि टिकरी सीमेवर जमले आहेत. तर उत्तर प्रदेशच्या सीमेवरसुद्धा भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी हजारोंच्या संख्येने जमले आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी शनिवारी दिल्लीतील एका बाजूला कूच केली आणि दिल्लीतील विविध सीमांवर ठाण मांडले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारतdelhiदिल्ली