शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:33 IST

केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे. दिल्लीतील शाहीन बागसारख्या ठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी होत असलेल्या मंडळींकडून करण्यात येत असलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे वादास तोंड फुटत आहे. एकीकडे शरजील इमामने आसामसह पूर्वोत्तर भारत देशाच्या मुख्य भागापासून वेगळे करण्याचा मनसुबा व्यक्त करणाऱ्या केलेल्या विधानावरून वाद झाला असतानाच आता शाहीन बाग येथील आंदोलनातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कुख्यात दहशतवादी अफझल गुरू हा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळाहिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहनभाजपा नेते संबित पात्रा यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ''आता त्या नापाक शरजील इमामनंतर या बाई काय म्हणताहेत तेही ऐका. आमचा कुणावरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयावरसुद्धा विश्वास नाही. अफझल गुरू निर्दोष होता. रामजन्मभूमीवर मशीद बांधायची होती. मित्रानो एवढी विषाची शेती या काही दिवसांत तर झालेली नाही?'' असा सवाल संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे. 

  या व्हिडीतओत दिसत असलेली तरुणी म्हणते की, आम्ही सीएए आणि एनआरसीमुळे आंदोलनात उतरलो आहोत. आम्ही केवळ त्याच्याविरोधात आंदोलन सुरू केलेले नाही. आता आम्ही सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही, ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू शकत. सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरू याला देशातील कलेटिक्टिव्ह कॉन्शससाठी फाशीवर चढवले. आता अफझल गुरूचा संसदेवरील हल्ल्यात कुठलाही हात नसल्याचे समोर आले आहे. कोर्ट एकदा सांगते की बाबरी मशिदीच्या खाली मंदिर नव्हते. मशिदीचे ताळे तोडणे चुकीचे होते. मशीद पाडणे चुकीचे होते. मात्र नंतर सांगते की त्या ठिकाणी मंदिर बनणार,''

तत्पूर्वी शाहीन बाग येथील आंदोलनाशी संबंधित असलेल्यांनी आपल्या आंदोलनाचा कुणीही नेता नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शरजील इमामशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले होते. तसेच शरजील इमाम याने शाहीन बाग येथे हे विधान केले नव्हते, असाही दावा या मंडळींनी केला आहे. तसेच शाहीन बाग येथील आंदोलन हे महिला करत असून, शरजील याचे त्याच्याशी काहीही घेणे देणे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारत