शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:33 IST

केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे. दिल्लीतील शाहीन बागसारख्या ठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी होत असलेल्या मंडळींकडून करण्यात येत असलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे वादास तोंड फुटत आहे. एकीकडे शरजील इमामने आसामसह पूर्वोत्तर भारत देशाच्या मुख्य भागापासून वेगळे करण्याचा मनसुबा व्यक्त करणाऱ्या केलेल्या विधानावरून वाद झाला असतानाच आता शाहीन बाग येथील आंदोलनातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कुख्यात दहशतवादी अफझल गुरू हा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळाहिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहनभाजपा नेते संबित पात्रा यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ''आता त्या नापाक शरजील इमामनंतर या बाई काय म्हणताहेत तेही ऐका. आमचा कुणावरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयावरसुद्धा विश्वास नाही. अफझल गुरू निर्दोष होता. रामजन्मभूमीवर मशीद बांधायची होती. मित्रानो एवढी विषाची शेती या काही दिवसांत तर झालेली नाही?'' असा सवाल संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे. 

  या व्हिडीतओत दिसत असलेली तरुणी म्हणते की, आम्ही सीएए आणि एनआरसीमुळे आंदोलनात उतरलो आहोत. आम्ही केवळ त्याच्याविरोधात आंदोलन सुरू केलेले नाही. आता आम्ही सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही, ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू शकत. सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरू याला देशातील कलेटिक्टिव्ह कॉन्शससाठी फाशीवर चढवले. आता अफझल गुरूचा संसदेवरील हल्ल्यात कुठलाही हात नसल्याचे समोर आले आहे. कोर्ट एकदा सांगते की बाबरी मशिदीच्या खाली मंदिर नव्हते. मशिदीचे ताळे तोडणे चुकीचे होते. मशीद पाडणे चुकीचे होते. मात्र नंतर सांगते की त्या ठिकाणी मंदिर बनणार,''

तत्पूर्वी शाहीन बाग येथील आंदोलनाशी संबंधित असलेल्यांनी आपल्या आंदोलनाचा कुणीही नेता नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शरजील इमामशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले होते. तसेच शरजील इमाम याने शाहीन बाग येथे हे विधान केले नव्हते, असाही दावा या मंडळींनी केला आहे. तसेच शाहीन बाग येथील आंदोलन हे महिला करत असून, शरजील याचे त्याच्याशी काहीही घेणे देणे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारत