शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

सात तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई-अहमदाबाद विमानाचं अखेर उड्डाण, प्रवाशांचा एअर इंडियावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 12:42 IST

एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं.

ठळक मुद्दे एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर तब्बल सात तास 250 प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

मुंबई-  एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर तब्बल सात तास 250 प्रवाशांचा खोळंबा झाला होता. शनिवारी हा प्रकार घडला आहे. एअरपोर्टवर प्रवाशांना एअरालाइन्सकडून जेवण व इतर सोयी न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, विमानाने तब्बल सात तासाच्या विलंबानंतर उड्डाण केल्याची माहिती मिळते आहे.

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रात्री दीड वाजताच्या सुमारास विमान होतं. याच विमानाला उड्डाण करायला तब्बल सात तासांचा विलंब झाला. विमान उशिरा असल्याची माहिती प्रवाशांना शेवटच्या मिनिटाला देण्यात आली. संतापलेल्या प्रवाशांनी एअरपोर्टच्या एक्झिट गेट 47 जवळ आंदोलन केलं. 

एअर इंडियाचं AI031 हे विमान मुंबई विमानतळावरून मध्यरात्री १.३५ वाजता अहमदाबादसाठी उड्डाण करणार होतं. पण, पायलट उपलब्ध नसल्याने ते सकाळी उड्डाण करेल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यावर संतप्त प्रवाशांनी एअर इंडियाविरोधात आंदोलन केलं. काही प्रवाशांनी विमानतळावरच धरणं आंदोलन केलं.  यामुळे एअरपोर्टवर काही तास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  दरम्यान, एअर इंडियाच्या या कारभारामुळे प्रवाशांना रात्र एअर पोर्टवर जागून काढावी लागली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAirportविमानतळ