शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सात तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई-अहमदाबाद विमानाचं अखेर उड्डाण, प्रवाशांचा एअर इंडियावर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 12:42 IST

एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं.

ठळक मुद्दे एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर तब्बल सात तास 250 प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

मुंबई-  एअर इंडियाचं मुंबई-अहमदाबाद विमान तब्बल सात तास उशिराने होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर तब्बल सात तास 250 प्रवाशांचा खोळंबा झाला होता. शनिवारी हा प्रकार घडला आहे. एअरपोर्टवर प्रवाशांना एअरालाइन्सकडून जेवण व इतर सोयी न दिल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, विमानाने तब्बल सात तासाच्या विलंबानंतर उड्डाण केल्याची माहिती मिळते आहे.

मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी रात्री दीड वाजताच्या सुमारास विमान होतं. याच विमानाला उड्डाण करायला तब्बल सात तासांचा विलंब झाला. विमान उशिरा असल्याची माहिती प्रवाशांना शेवटच्या मिनिटाला देण्यात आली. संतापलेल्या प्रवाशांनी एअरपोर्टच्या एक्झिट गेट 47 जवळ आंदोलन केलं. 

एअर इंडियाचं AI031 हे विमान मुंबई विमानतळावरून मध्यरात्री १.३५ वाजता अहमदाबादसाठी उड्डाण करणार होतं. पण, पायलट उपलब्ध नसल्याने ते सकाळी उड्डाण करेल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यावर संतप्त प्रवाशांनी एअर इंडियाविरोधात आंदोलन केलं. काही प्रवाशांनी विमानतळावरच धरणं आंदोलन केलं.  यामुळे एअरपोर्टवर काही तास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  दरम्यान, एअर इंडियाच्या या कारभारामुळे प्रवाशांना रात्र एअर पोर्टवर जागून काढावी लागली. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAirportविमानतळ