शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सीमा हैदरनंतर मेहविश, दोन मुलांची आई लग्न करून भारतात आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 10:35 IST

पाकिस्तानातून आलेल्या दोन मुलांच्या आईने राजस्थानमधील तरुणाशी लग्न केले आहे. मेहविश असे या महिलेचे नाव असून ती राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय प्रियकरासोबत राहण्यासाठी आली आहे.

भारत पाकिस्तानमधून विस्तवही जात नाहीय तिथे तरुण, तरुणी लग्न करत आहेत. गेल्या वर्षी सीमा हैदरने भरपूर प्रसिद्धी मिळविली होती. पाकिस्तानातून आलेल्या या महिलेने भारतीय तरुणाशी लग्न केले होते. आता असाच कित्ता ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या दोन मुलांच्या आईने केला आहे. 

पाकिस्तानातून आलेल्या दोन मुलांच्या आईने राजस्थानमधील तरुणाशी लग्न केले आहे. मेहविश असे या महिलेचे नाव असून ती राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय प्रियकरासोबत राहण्यासाठी आली आहे. या प्रेम कहाणीमध्ये कुवेत आणि सौदी असे आणखी दोन देश सहभागी आहेत. 

मेहविशही पाकिस्तानच्या लाहोरची राहणारी आहे. मेहविशने २००६ मध्ये बादामी बागच्या व्यक्तीशी लग्न केले होते. त्यांना १२ आणि ७ वर्षांचे दोन मुलगे आहेत. २०१८ मध्ये त्यांनी तलाक घेतला होता. यानंतर तिच्या पतीने दुसरे लग्न केले होते. 

राजस्थानचा राहणारा रहमान हा कुवेतला ट्रान्सपोर्टर म्हणून नोकरी करत होता. त्याची मेहविशशी फेसबुकवर ओळख झाली. दोघे प्रेमात पडले. यानंतर मेहविशने तिची बहीण आणि बहीणीचा नवरा यांना ही गोष्ट सांगितली. यानंतर १३ मार्च २०२२ ला रहमानने तिला प्रपोज केले. या दोघांनी १६ मार्चला व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे लग्न केले. यानंतर २०२३ मध्य मक्केला जात तिथे विवाह केला. 

आता २५ जुलैला मेहविशने वाघा बॉर्डर क्रॉस करत भारतात पाऊल ठेवले. टुरिस्ट व्हिसावर ती ४५ दिवसांसाठी भारतात आली आहे. रहमानने तिला त्याच्या गावी पीथिसारला आणले आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली असून स्थानिक पोलिसही तपास करत आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानRajasthanराजस्थान