शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'त्या' सजग प्रवाशाच्या एका ट्विटमुळे वाचलं 26 मुलींचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 13:26 IST

रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशाला संशय आला असता त्याने केलेल्या एका ट्विटनंतर गोरखपूरजवळ जीआरपी आणि आरपीएफने या सर्व मुलींची सुटका केली. 

पाच जुलै रोजी मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला  एस-5 या कोचमध्ये जवळपास 25 मुली रडताना दिसल्या. मुली रडत असताना मुलींच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि भीती लक्षात येताच त्या सजग प्रवाशाने याबाबतचे एक ट्विट केले होते. प्रवाशाच्या या ट्विटची दखल घेत वाराणसी आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. गोरखपूर येथील जीआरपी विभागाने चाइल्डलाइन तसेच पोलिसांच्या तस्करीविरोधी पथकाच्या समन्वयाने ही कारवाई सुरू केली. अवध एक्सप्रेस कापतागंज रेल्वे स्थानकात पोहोचताच साध्या वेशातील आरपीएफचे दोन जवान ट्रेनमध्ये चढले.

कारवाई दरम्यान 22 आणि 55 वर्षांच्या दोन पुरुषांसह 26 अल्पवयीन मुली प्रवास करताना आढळल्या. बिहारमधील पश्चिम चंपारण येथील हे सर्वजण रहिवासी असल्याची माहिती समोर आली. तसेच या सर्व मुलींना नारकटिक्यागंज येथून इदगाह येथे नेले जात होते. याबाबत मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी  समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळेच अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. या सर्व मुली 10 ते 14 वर्षे वयोगटातील  आहेत. तसेच याप्रकरणी दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून मुलींच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश