शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' सजग प्रवाशाच्या एका ट्विटमुळे वाचलं 26 मुलींचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 13:26 IST

रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशाला संशय आला असता त्याने केलेल्या एका ट्विटनंतर गोरखपूरजवळ जीआरपी आणि आरपीएफने या सर्व मुलींची सुटका केली. 

पाच जुलै रोजी मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला  एस-5 या कोचमध्ये जवळपास 25 मुली रडताना दिसल्या. मुली रडत असताना मुलींच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि भीती लक्षात येताच त्या सजग प्रवाशाने याबाबतचे एक ट्विट केले होते. प्रवाशाच्या या ट्विटची दखल घेत वाराणसी आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. गोरखपूर येथील जीआरपी विभागाने चाइल्डलाइन तसेच पोलिसांच्या तस्करीविरोधी पथकाच्या समन्वयाने ही कारवाई सुरू केली. अवध एक्सप्रेस कापतागंज रेल्वे स्थानकात पोहोचताच साध्या वेशातील आरपीएफचे दोन जवान ट्रेनमध्ये चढले.

कारवाई दरम्यान 22 आणि 55 वर्षांच्या दोन पुरुषांसह 26 अल्पवयीन मुली प्रवास करताना आढळल्या. बिहारमधील पश्चिम चंपारण येथील हे सर्वजण रहिवासी असल्याची माहिती समोर आली. तसेच या सर्व मुलींना नारकटिक्यागंज येथून इदगाह येथे नेले जात होते. याबाबत मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी  समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळेच अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. या सर्व मुली 10 ते 14 वर्षे वयोगटातील  आहेत. तसेच याप्रकरणी दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून मुलींच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश