शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

'त्या' सजग प्रवाशाच्या एका ट्विटमुळे वाचलं 26 मुलींचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 13:26 IST

रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रेल्वेतील एका सहप्रवाशाच्या सजगतेमुळे मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून नेल्या जात असलेल्या 26 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशाला संशय आला असता त्याने केलेल्या एका ट्विटनंतर गोरखपूरजवळ जीआरपी आणि आरपीएफने या सर्व मुलींची सुटका केली. 

पाच जुलै रोजी मुझफ्फरपूर-वांद्रे अवध एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला  एस-5 या कोचमध्ये जवळपास 25 मुली रडताना दिसल्या. मुली रडत असताना मुलींच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि भीती लक्षात येताच त्या सजग प्रवाशाने याबाबतचे एक ट्विट केले होते. प्रवाशाच्या या ट्विटची दखल घेत वाराणसी आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. गोरखपूर येथील जीआरपी विभागाने चाइल्डलाइन तसेच पोलिसांच्या तस्करीविरोधी पथकाच्या समन्वयाने ही कारवाई सुरू केली. अवध एक्सप्रेस कापतागंज रेल्वे स्थानकात पोहोचताच साध्या वेशातील आरपीएफचे दोन जवान ट्रेनमध्ये चढले.

कारवाई दरम्यान 22 आणि 55 वर्षांच्या दोन पुरुषांसह 26 अल्पवयीन मुली प्रवास करताना आढळल्या. बिहारमधील पश्चिम चंपारण येथील हे सर्वजण रहिवासी असल्याची माहिती समोर आली. तसेच या सर्व मुलींना नारकटिक्यागंज येथून इदगाह येथे नेले जात होते. याबाबत मुलींकडे चौकशी केली असता त्यांनी  समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळेच अल्पवयीन मुलींना बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. या सर्व मुली 10 ते 14 वर्षे वयोगटातील  आहेत. तसेच याप्रकरणी दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून मुलींच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश