शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 05:56 IST

नरसंहारानंतर केंद्राचा लष्कराला सज्ज राहण्याचा आदेश; क्षेपणास्त्रांचा पाकवर मारा करण्याचा पर्याय’

सुरेश एस. डुग्गरजम्मू : पुलवामा येथे झालेला हल्ला तसेच पहलगाममध्ये घडलेल्या नरसंहारानंतर भारतपाकिस्तानविरोधात युद्ध पुकारणार का, असा प्रश्न असंख्य लोकांना पडला आहे. मात्र, सीमेवर संपूर्ण युद्ध न होता कारगिलसारखी लघु युद्धे दोन्ही देशांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्करालाही अतिशय सतर्क राहण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला असून, ही काही गोष्टींची पूर्वतयारी असू शकते असेही म्हटले जाते. 

२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता.  लष्करातील एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, लष्कर प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज होत आहे. मात्र, या कारवाईचे स्वरूप काय असेल याबद्दल त्याने माहिती दिली नाही. यापूर्वी उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइकची जबाबदारीही उत्तर कमांडने यशस्वीपणे पार पाडली होती. भारतीय लष्कर पाकिस्तानला शिक्षा देण्यासाठी विविध गोष्टींचा विचार करत आहे. पाकिस्तानच्या हालचालींचं उत्तर फक्त राजनैतिक नव्हे तर लष्करी स्तरावरही देण्याची तयारी भारताने सुरू केली आहे. 

दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी हे चार पर्याय काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे नष्ट करण्यासाठी चार प्रमुख पर्याय भारतीय लष्कराने केंद्र सरकारला सुचविले. त्यातील एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ब्रह्मोस, पृथ्वी क्षेपणास्त्रांसारख्या जमिनीवरून जमिनीवर मारा करता येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करावा. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे या क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करता येतील. उर्वरित तीन पर्यायही विचाराधीन असून, त्यापैकी एक म्हणजे भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे.म्हणजे लष्कर सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करून, एलओसी पार करून दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करून माघारी येईल.

मोर्टार आणि बोफोर्स तोफा वापरू द्या : लष्कर भारतीय लष्कराने केंद्राला सुचविलेला दुसरा पर्याय म्हणजे बोफोर्स तोफांचा मुक्त वापर करण्याची परवानगी देणे. यामध्ये एलओसीपासून १८ ते २० किमी अंतरावर असलेल्या काही केंद्रांवर मोर्टार आणि बोफोर्स तोफा वापरून हल्ला केला जाईल. बोफोर्स तोफा डोंगराळ भागात २८ ते ३० किमी अंतरावर मारा करू शकतात आणि एलओसीवर या तोफा पुन्हा तैनात करण्यात आल्या आहेत. तिसरा पर्याय म्हणजे भारतीय वायुसेना आणि ड्रोन हल्ल्यांचा वापर करून प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करणे. यामध्ये राफेल, मिराज-२००० आणि सुखोई विमाने वापरण्याचा प्रस्ताव आहे, कारण ही विमाने अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत