शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझ्यानंतर ‘पतंजली’चा कारभार ५०० साधुंकडे - रामदेवबाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:50 IST

‘पतंजली’ उद्योग समूहातून मी निवृत्त झाल्यानंतर माझे वारस म्हणून ५०० प्रशिक्षित साधू या समूहाचा कारभार माझे उत्तराधिकारी म्हणून पाहतील, असे या उद्योग समूहाचे संस्थापक व योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितले.

नवी दिल्ली: ‘पतंजली’ उद्योग समूहातून मी निवृत्त झाल्यानंतर माझे वारस म्हणून ५०० प्रशिक्षित साधू या समूहाचा कारभार माझे उत्तराधिकारी म्हणून पाहतील, असे या उद्योग समूहाचे संस्थापक व योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितले.‘इंडिया टीव्ही’ या वाहिनीवर रजत शर्मा यांच्या ‘आपकी अदलात’मध्ये शनिवारी रात्री बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, मी कधी लहान सहान विचार करत नाही. मी देशाचा विचार पुढच्या ५०० वर्षांचा करतो. ‘पतंजली’चाही माझा विचार पुढील १०० वर्षांचा असतो. याच विचारातून मी ‘पतंजली’च्या कारभाराची वारसा योजना आखली आहे. मी या उद्योग समूहातून बाहेर पडल्यावर, हे माझे वारस कारभार हाती घेतील.माझ्यानंतर ‘पतंजली’चा कारभार पाहणारे कोणी व्यापारी किंवा ऐहिक विश्वातील लोक नसतील, ते ५०० साधू असतील. त्यांना मी प्रशिक्षण देऊन तयार करून ठेवत आहे.‘आपकी अदालत’मध्ये रामदेवबाबांवर ‘मुकदमा’ चालविण्यासाठी अनेक भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बडे अधिकारी व व्यवस्थापन तज्ज्ञ हजर होते.काही लोक ‘पतंजली’ ही हिंदू कंपनी आहे, अशी टीका करतात, पण ते चुकीचे आहे, असे सांगून रामदेव बाबा म्हणाले, हमदर्द बंधुंनी स्थापलेल्या ‘हमदर्द’ कंपनीस मी कधी (मुस्लीम म्हणून) विरोध केला आहे? ‘हमदर्द’ आणि ‘हिमालया’ या कंपन्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. ‘हिमालया’ समूहाच्या फारुखभार्इंनी मला ‘योगग्राम’साठी जमीनही दिली. त्यामुळे जे लोक असा अपप्रचार करतात, ते निष्कारण तेढ पसरवित असतात.गोमूत्रास कुराणाची मान्यतागोमूत्राचा एक औषध म्हणून वापर करण्यास मुस्लिमांची हरकत असण्याचे काहीच कारण नाही. कारण रुग्णावरील इलाजासाठी गोमूत्राचा उपयोग केला जाऊ शकतो, अशी मुभा कुरआननेही दिलेली आहे, असा दावाही रामदेवबाबांनी केला.