शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

महाराष्ट्रानंतर बिहार, संकटात नितीश कुमार, बडा नेता बंडाच्या पावित्र्यात, जेडीयू फुटणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:43 IST

Upendra Kushwaha : महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण निसटला आहे. आता महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण निसटला आहे. आता महाराष्ट्रानंतर बिहारमध्येहीनितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाहा यांच्यातील लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पाटणा येथील सिन्हा लायब्रेरीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये उपेंद्र कुशवाहा यांनी आपले निकटवर्तीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून पुढील रणनीतीबाबत मत जाणून घेतले. आता बैठकीच्या दुसऱ्या दिवशी उपेंद्र कुशवाहा दुपारनंतर नव्या पक्षाची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी उपेंद्र कुशवाहा गटातील नेत्यांमध्ये एकमत बनताना दिसत आहे, या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बैठकीच्या आधी सर्व नेत्यांनी आपलं मत मांडलं. त्यात काही नेत्यांनी सांगितलं की,  नितीश कुमार यांनी जेडीयूला राजदची बी टीम बनवली आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष बनेल तो बिहारच्या जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करेल. एका अन्य नेत्याने नितीश कुमार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले की, आम्ही राजदची बी टीम म्हणून काम करणार नाही. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयूने आपली ओळख गमावली आहे. आता आम्ही त्यांच्यासोबत काम करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही वेगळ्या पक्षाच्या स्थापनेवर भर देत आहोत. हा पक्ष बिहारच्या जनतेच्या कल्याणासाठी काम करेल.

त्यांनी पुढे सांगितले की, उपेंद्र कुशवाहा यांनी माझ्या मागणीशी सहमती दर्शवली आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. त्यामध्ये सोमवारी दुपारनंतर ते मौर्या हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलणार असल्याचे सांगण्यात आले. उपेंद्र कुशवाहा यांचे निकटवर्तीय माधव आनंद यांनी सांगितले की, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात काम केले आहे. तसेत नितीश कुमार यांनाही कमीपणा दाखवण्याचं काम केलं आहे.  त्यांनी सांगितलं की, काही ज्येष्ठ नेतेच जेडीयूचं राजदमध्ये विलिनीकरण व्हावं यासाठी पक्षाविरोधात काम करत आहेत.

ते म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाला कमकुवत करण्यासाठी कुठलं कारस्थान रचण्यात आलं, हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे. पक्ष आरजेडीमधील विलिनीकरणाच्या बातम्यांचं जाहीरपणे खंडन का करत नाही आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  आखिरकार  या घटनाक्रमामुळे आता उपेंद्र कुशवाहा हे आता राष्ट्रीय लोकसमता पार्टीला किंवा समता पार्टीला पुन्हा जीवित करतात की, कुठल्या अन्य नाव्याने नव्या पक्षाची घोषणा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तसेच उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वात जो पक्ष स्थापन केला जाईल तो एनडीएमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतही उत्सुकता आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारण