शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा मित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 12:36 IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता नवनवी समीकरणे उदयास येऊ लागली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी नव्या जुन्या मित्रांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली आहे.

हैदराबाद -  2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता नवनवी समीकरणे उदयास येऊ लागली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी नव्या जुन्या मित्रांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपाला लोकसभा निवडणुकीनंतर अजून एक मित्र पक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत असलेले चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती पक्ष आणि भाजपामध्ये निवडणुकीनंतर युती करण्याबाबत सहमती बनताना दिसत आहे.  तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे एक तास चाललेल्या या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राव यांच्यात 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली. या चर्चेवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी करणे आपल्या पक्षासाठी फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपाला गरज पडली तर आघाडीसाठी तयार आहोत, असे राव यांनी सांगितले.  भाजपा आणि टीआरएसमध्ये जवळीक वाढत असली तरी तेलंगाणामध्ये भाजपाला शिरकाव करू देण्यास टीआरएस तयार नाही. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव पक्षाने फेटाळला आहे. तेलंगाणामध्ये विजयी ठरण्यासाठी पात्र उमेदवार भाजपाकडे नाहीत असे टीआरएसचे मत आहे. त्यामुळे पाच ठिकाणी भाजपाला टीआरएस मदत करू शकते.  दरम्यान, तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या टीआरएसचे विविध प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पुढील समीकरणे जुळवण्यासाठी भाजपाला टीआरएस उपयुक्त ठरतील.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण