शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

तातडीच्या बदलीनंतर न्या. मुरलीधर म्हणाले, उच्च न्यायालयातील हा माझा शेवटचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 09:22 IST

भाजपाचे नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा व अभय वर्मा या भाजप नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल गुन्हे नोंदवण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्यावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले होते.

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे तिसरे वरिष्ठ न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी बुधवारी उशीरा रात्री बदलीची सूचना मिळाल्यानंतर गुरुवारी एका प्रकरणाचा निर्णय दिला. त्यानंतर ते म्हणाले दिल्ली उच्च न्यायालयातील हा माझा शेवटचा निर्णय आहे. 

न्यायमूर्ती मुरलीधर यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसा प्रकरणाची सुनावणी घेतली होती. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांना चांगलेच फटकारले होते. त्यानंतर उशीरा रात्री त्यांची बदली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात करण्यात आली. त्यानंतर वाद निर्माण झाला आहे. 

न्यायालय गुरुवारी बंद होताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयानंतर दिल्ली सरकारचे अतिरिक्त स्टँडींग कौन्सिल गौतम नारायण यांनी न्यायमूर्ती मुरलीधर यांच्यासोबत काम करणे आपला सन्मान असल्याचे म्हटले. मात्र श्रीमंत भागात व्यावसायिक घडामोडींसंदर्भातील मुरलीधर आणि न्यायमूर्ती व्ही.के. राव यांच्या खंडपीठाचा निर्णय अद्याप अधिकृतपणे अपलोड झालेला नाही.

दिल्ली हिंसाचार सुनावणीवेळी हायकोर्टाने दिल्लीत पुन्हा १९८४ ची पुनरावृत्ती होऊ देऊ नका असं सांगत दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. आम्ही आताही १९८४ च्या दंगलीतील पीडितांच्या नुकसान भरपाईच्या प्रकरणांवर सुनावणी करत आहोत. अशाप्रकारे पुन्हा होऊ देऊ नका असं सांगितले. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा व अभय वर्मा या भाजप नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल गुन्हे नोंदवण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्यावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले होते.